सोमवार, 23 मार्च 2020

भिमसेनी कापूर

भिमसेनी कापूर हा आयुर्वेदिक उत्पादन असून त्यात कुठल्याही रसायनांचा सहभाग नसतो. सुमात्रा, बोर्निऒ च्या जंगलात साधारण ८० ते १०० फ़ूट वाढणाऱ्या या झाडापासून हा भिमसेनी कापूर मिळतो. ही झाडं जसजशी मोठी होत जातात, तसतसं यांच्या उभ्या आडव्या खाचांमध्ये कापराची निर्मिती होते. हे प्रमाण कमी असल्यानेच हा कापूर महाग असतो. अनेक शतकांपासून या देशांमधून अनेक ठिकाणी कापूराचा अर्क पाठवण्याचा व्यवसाय सुरु होता. कापराचे झाड अतिशय उंच वाढतेच नी जमिनीत लांबवर मुळं रुजवते. या झाडाचे बहुतेक सर्व भाग वापरले जातात. मोठ्यामोठ्या बांधकामांसाठी तसेच मजबूत वापरासाठी [जसे की रेल्वेच्या स्लीपर्स फ़ळ्या] या झाडाच्या लाकडाचा वापर होतो कारण कापराचे लाकूड अतिशय मजबूत समजले जाते. या ताडमाड झाडाची फ़ुलं मात्र अगदी नाजूक एखाद सेमी असतात जी घोळक्यात येतात. यातूनच पुढे येणारी फ़ळं साधारण ५ ते ६ सेमीची नी पाच फ़ाक्यांची असतात. यातूनच या झाडाचे बी बनते. या झाडाच्या पानांपासून पुर्वापार तैलार्क बनवला जातो जो आजही अनेक देशांमधे त्वचेच्या अनेक उत्पादनांमधे वापरला जातो.
आता हे वाचल्यावर अनेकांना हा प्रश्न छळू शकतो की भारतात ही झाडं आहे का?
हो, आहेत.
आपल्या अनेक शासकिय व संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये ही झाडं लावून त्यावर प्रयोग केले जाताहेत. भारताखेरीज, चीन, जपान सह अनेक पाश्चिमात्य देशांमधे याच्या औषधी गुणधर्मांवर अधिकाधीक संशोधन होतय. आपले पुर्वज खुप हुशार ज्यांना या नैसर्गिक घटकांचा उपयोग व वापर सुपरिचीत होता.
भीमसेनी कापूर कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते.रासायनीक कापुर पाण्यावर तरंगतो.भिमसेनी कापुर तरंगत नाही.
---------------------------------------------------
*कापूर पवित्र का मानला जातो ?*
--------------------------------------------------
*जाणुन घ्या धार्मिक कारण ...*
शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते
*आयुर्वेदीक भिमसेनी कापूर कसा वापरावा*
हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते.
१) सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत. नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
२) रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
३) पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास कापुर हुंगावा.
४) तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .
५) केसातील कोंड्याकरीता : -
सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे
नेहमीच्या कापरात मेण असते,
पण यात मेण नसते.
त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा.
आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात,
*श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.*
६) दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.
७) खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.
शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते.
*संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही,*
-----------------------------------------------
*कापराचे इतर ही काही उपयोग*
------------------------------------------------
👉 प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येता एक छान सुगंध येतो कपड्यांना कसर ,झुरळ लागत नाही
पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना कुबट वास येतो तो कापूर ठेवल्या जातो.
👉 डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीतच शिवाय इतर कीटक , उंदीर वगैरे लांब राहतात
👉 कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात
👉 रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते. आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही
👉 गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लीक्वीड ऐवजी त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित
👉 कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल
-------------------------------------------------
*कापूर पवित्र का मानला जातो.?*
-------------------------------------------------
*जाणुन घ्या धार्मिक कारण*
👉शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही.
👉 कापूर लावल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा पवित्र वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
*कापराचे वैज्ञानिक महत्त्व*
👉वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की,
*कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होउन वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.*
*कापूराचे अजून काही फायदे*
१) सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.२) कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
३) कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
४) कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
५) घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.
६) मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
७) मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.
*८) पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा बुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.*
९) गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. *(५०शी ओएलांडलेल्यांना अधिक उपयोगी)*
कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते.

कोई टिप्पणी नहीं: