रविवार, 23 सितंबर 2012

आयुर्वेदाचे दुखणे --३० जुलै १९९५ गावकरी

आयुर्वेदाचे दुखणे 

रविवार दि ३० जुलै १९९५
गांवकरी नाशिक

एखादा डाँक्टर "मेडिसिन" शिकून अँनँसीन देत असेल,तर तो क्लास वन डाँक्टर !
पण आयुर्वेद शिकून "तुळशीचा काढा " देणार्या वैद्याच्या माथी मात्र "क्लास -थ्री"ची नोकरी!
हा कुठला न्याय आहे!
पाच सात हजार वर्षापूर्वीच्या ग्रंथात जसे सांगितले, तसेच औषध करण्याचा अट्टाहास चुकीचा नाही का? नव्या शास्त्रांची मदत घेऊन आयुर्वेदाच्या वैद्यांनी काही नविन का शोधुन काढू नये?थर्मामिटरस्टेथोस्कोपएक्स-रे यांच आयुर्वेदाला वावडे असलेच पाहिजे का 
आयुर्वेदातील अत्यंत गुणकारी औषधे  इंजेक्शन किंवा सलाईनमधुन का देऊ नयेत
अशा उपयोगासाठी आवश्यक शोधकार्य एनआयए ने का करू नये

शासन आणि समाजाने आयुर्वेदाच्य़ा माथी मारलेला अवैज्ञानिकपणाचा ठपका पुसून टाकणे 
हाच या दुखण्यावरचा इलाज आहे.




बघता बघता उरलीसुरली पाच वर्ष जातील, पण आरोग्याबाबत गेल्य़ा पंधरा वर्षापासून आपण घोकत असलेला संकल्प Health for all by 2000 AD हा काही पूर्ण झालेला नसेल.
हा संकल्प जेव्हा कधी पूर्ण व्हायचा असेल तेव्हा तो आयुर्वेदाचा विचार केल्याशिवाय होणार नाही. तसेच त्यासाठी आयुर्वेदाबाबतच्या आपल्य़ा भूमिकेतही बदल होणे गरजेचे असेल, असे
माझे बरेचसे ठाम मत आहे.

आयुर्वेदाबाबत शासनाची भूमिका काय, असा प्रश्न विचारला तर त्याचे शब्दालंकृत, स्तुतिसुमने उधळणारे उत्तर मिळते. आयुर्वेद या देशाचे भूषण आहे. आपल्या उज्ज्वल आणि दिव्य परंपरेचा वारसा आहे. त्यांच्या विकासासाठी सरकार कमिटेड आहे. त्याच्यासाठी पैशाची काही कमकरता पडू दिली जाणार नाही.हे उत्तर कित्येक वर्षापासून चालत आलेले आहेकेंद्र सरकारातस्वास्थ मंत्रालयात आयुर्वेदाच्या विकासासाठी इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीन (ISM) अशी वेगळी शाखा आहेअधिकारी वर्ग आहेबर्यापैकी पैसाही असतोज्यातला बराच पैसा अखर्चित राहून सरेंडर केला जातो

(ISM) या शब्दात आयुर्वेदाबरोबरच होमिआपॅथियूनानीनिसर्गोपचारसिद्ध,योग हे सर्व प्रकार अंतर्भूत होतातपूर्वी या शाखेचे काम एक अंडर सेक्रेटरी पहातमग एक डायरेक्टर आले नंतर एक जाइंट सेक्रेटरी आले अशा वरिष्ठ अधिकार्यांकडे हे काम सोपवले गेलेआता पूर्ण वेळ सचिव हे काम बघतीलदिल्लीत निर्माण भवनमध्ये जे स्वास्थ्य मंत्रालय आहे तिथून(ISM) चा पसारा आवरून त्यानां वेगळी जागा पण दिली जाईलपुढे मागे कदाचित वेगळे मंत्री पण येतीलदरम्यान आयुर्वेदाच्या विकासासाठी इतरही बरेच घडले आहेकेंद्र शासनाने जयपूर येथे नॅशनल इन्सि्ट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू केली आहेइथे BAMS हा अभ्याक्रम चालविला जातो.त्यासाठी लागणार मोठं आयुर्वेदिक हॉस्पिटलपण आहेपी.एच.डीपर्यंत अभ्यासक्रमाची सोय आहेयाशिवाय सेंट्रल कौन्सिल ऑफ रिसर्च फॉर आयुर्वेद अड सिद्ध CCRAS आहेत्याशिवाय CCIM म्हणजे सेंट्रल कौन्सिल फॉर इंडियन मेडिसीन नावाची देशातील सर्व आयुर्वेदांच्या निव़डणुका घेऊन स्थापन केलेली संस्था पण आहे.

अनाकलनीय गृहीतके 

थोडक्यात अॅलोपॅथिच्या संदर्भात जशा जशा संस्था असतील तशा तशा आयुर्वेदात आणल्या कीआयुर्वेदाचा विकास होतो हे शासनाच एक मुख्य ग्रहीत सुत्र आहेया संस्था अॉलोपॅथीपासून वेगळ्या काढल्या तरच आयुर्वेदाचा विकास होतो हे दुसरे ग्रहीत सू्त्रया दुसर्या सूत्रामुळे पुढे असे झाले कीआयुर्वेदापासून वेगळे काढले तरच यूनानी किंवा होमिओपॅथी किंवा निसर्गोपचार किंवा सिध्द किंवा योग या पध्दतींचा विकास होऊ शकतो,अन्यथा नाही! असे तर्क वापरुन होमिओपॅथिकयूनानीनिसर्गोपचार आणि योग या पध्दतीचा कारभार वेगळा ठेवण्याची सोय करण्यात आली आहेया सर्वांचे पुढचे विभाजणीकरण देखील यथाकाल चालू राहीलच.


तोच प्रकार संस्था स्थापन करण्याचा.  अलोपॅथीमध्ये ऑल इंडिया इंन्सि्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स AIIMS आहेम्हणून आयुर्वेदात नॅशनलइंन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेद (NIA) होमिओपॅथी (NIH) नॅचरोपॅथीमध्ये (NIN) युनानीमध्ये (NIYM) (युनानी मेडिसीनअशा संस्था काढल्यातिकडे अॅलोपॅथीतइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) अशी रिसर्चला वाहून घेतलेली संस्था आहेम्हणून इकडे आयुर्वेदात सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इनआयुर्वेद अॅण्ड सिध्द CCRAS काढलीतर होमिओपॅथी मध्ये CCRH युनानीमध्ये CCRYM योग अॅण्ड नॅचरोपॅथीसाठी CCRYN काढलीतिकडेअॅलोपॅथीत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिसीन ICM ही संस्था काढलीम्हणून इकडे आयुर्वेदात सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन CCIM तरहोमिओपॅथीत CCIH आहेतिकडे एक सचिव आहेतम्हणून इकडे एक सचिव....वगैरे 

अशा संस्था उभारून आणि त्यांच्यामध्ये प्रशासकीय पदावर खर्च करून आयुर्वेदाचा विकास होतो का याचं उत्तर कदाचित होय असेल आणिकदाचित नाही पण असेलपण माझा मुख्य मुद्दा तो नाही

हे सारे कशासाठी 

मुख्य मुद्दा असा आहे कीशासनाच्या आरोग्यविषयक योजनांचे कोणते आहेत तर लोकांना चांगले आरोग्य मिळणेहे चांगले आरोग्य कशातूनमिळते असे शासनाला वाटतेते जर फक्त अॅलोपॅथीतून मिळते असे वाटत असेल तर आयुर्वेद किंवा च(ISM) हा विषय स्वास्थ्य मंञालयाच्या कक्षेतनसून ऑर्कियोलॉजी या खात्याकडे असावाजर आयुर्वेदातून पण स्वास्थ्यलाभ होतोअसे शासनाला वाटत असेल तर लोकांना स्वास्थ्यरक्षणासाठीआयुर्वेद उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने काय केले आहे ? याचा तपास व्हायला हवा

शासनाने स्वतः आयुर्वेद महाविद्यालये व आयुर्वेद दवाखाने काढलेले आणि चालवलेले आहेइथल्या डॉक्टरांवर व इथून निघणाय्रा विद्याथ्य्रांवर ज्यांनाशासन स्वतः पगार व डिग्री देत असतेसरकारचा किती विश्वास आहेगेली तीन चार वर्षे सतत ठाणे जिल्ह्यात ठराविक महिन्यात मलेरियाची साथयेतेत्यावेळी आजारी असलेल्या सर्व रूग्णांना ट्रिटमेंट देण्याइतके पुरेसे डॉक्टर देखील मिळू शकत नाहीत अशावेळी निरूपायाने काही आयुर्वेदाचेडॉक्टर देखील या पथकांमध्ये घेतले जातातमाञ त्यांनी अॅलोपॅथीमधील औषधच दिली पाहिजेत असा दंडक असतोत्यासाठी हवे तर सातआठदिवसांचे स्पेशल ट्रेनिंग पण दिले जातेआता आयुर्वेदात मलेरिया वर औषध नाही का बाराक्षार पध्दतीत ते आहे व निसर्गोपचार पध्दीतही आहे हामाझा स्वानुभव आहे.आयुर्वेदातही आहे असे त्यातील तज्ञांचे मत पण असे उपाय असूनही शासन आपल्या यंत्रणेमार्फत हे उपाय लोकांपर्यंत पोहाचवतेका ? याचे उत्तर नाही असेच आहेमग जे तंञ लोकांच्या स्वास्थ रक्षणासाठी शिकले जाते पण ते लोकांपर्यंत पोहचू दिले जात नसेल तर त्याशिक्षणाचा काय उपयोग त्याने लोकांचे आरोग्य रक्षणही होऊ शकत नाही आणि आयुर्वेदाचा तर 
नाहीच नाही

यासाठी आयुर्वेदाबाबत शासनाच्या दृष्टिकोनात मोठा बदल व्हायला पाहिजेतो म्हणजे आयुर्वेदावरील अवैज्ञानिक हा ठपका दूर झाला पाहिजेहाठपका मुळात आला तो १८५० पासून सूरू झालेल्या इंग्रजांनी राबविलेल्या शिक्षण प्रणालीतूनत्या काळात युरोपात अॅलोपॅथीच्या विकासास नुकतीचसुरूवात झाली होतीत्यातही जे जे 'नेटिव्हते ते अवैज्ञानिक' अशीही भावना होतीचत्यामुळे इंग्रजांच्या प्रणालीतील अॅलोपॅथी डॉक्टरला मानाचे स्थान,सरकार दरबारी नोकरीचांगला पगार व चांगले स्टेटस् असे समीकरण तयार झालेस्वदेशी आंदोलनामध्ये काही प्रमाणात आयुर्वेद विद्यालये पणत्यांच्या वाट्याला पैसा येणे शक्य नव्हतेदुर्दैवाने स्वातंञ्यानंतर सरकारने इंग्रजांचीच शिक्षण पध्दत कायम ठेवली आणि मानापानाचे हे नाटकआयुर्वेदाच्या वाट्याला कायम येऊन बसलेआजदेखील हुशार विद्यार्थी आधी अॅलोपॅथीकडेच जाईलकारण पैसा तिकडेच आहेखरे तर दोघांचा कोर्सपाहिल्यास निदान सुरवातीला एनॅटॉमीफिजिऑलॉजी असे सारखेच विषय असताततरीही मेडिसीन शिकून एनॅसिन देऊ लागला तर तो क्लास वनडॉक्टरच्या पोस्टला पाञ ठरतो तसा तो ठरोपण त्यामुळे मलेरियाची साथ आली असता एखादे आयुर्वेदिक औषध तशा रूग्णाला दिले जाऊ शकतनाहीत्यामुळे जो रोगी चांगल्या औषधाला मुकतो त्याचे काय

या प्रश्नाचे ऊत्तर सोपे नाहीअॅलोपॅथी औषधे तयार होत असतानाजगभर त्याचे संशोधन होत असतेते गतिमय शास्ञ म्हणून सजीव आहे.तेजस्वी आहेआज अॅलोपॅथीमध्ये मलेरियासाठी औषध नसेल तर उद्या शोधले जाईलनवे रोग उघडकीस येतीलत्यातले कित्येक अॅलोपॅथी औषधांच्या साईड इफेक्टमुळे असतील पण त्या रोगांसाठी नवे औषध किंवा सर्जरीचे नवे तंञही शोधले जाईलआयुर्वेदात नवे शोध व्हावेत गतिमानता यावी असा प्रयत्न कोण करतो किंवा आपले आयुर्वेदाचे सिलॅबस आणि आयुर्वेदाला न मिळणारा सन्मान अशा गतिमानतेला पोषक आहेका ? पाच सात हजार वर्षांपूर्वी ग्रंथात जे सांगून ठेवले तसेच औषध करायचे बंधन आहेमला आश्चर्य वाटते ते हे की त्या काळात चरकसुश्रूत किंवावराह मिर यांना कुणी सांगितले असते कीखबरदार नवीन काही शोधायचे नाहीते तीन हजार वर्षांपूर्वी असेल तेच तुम्ही करायचेतर आज आयुर्वेद कुठे असता 

गतिमानता येणार कशी 

हा गतिमानतेचा मुद्दा एक विशेष कारणामुळे फार महत्त्वाचा आहेआयुर्वेद काय किंवा अॅलोपॅथी काय ही दोन्ही Applied Sciences आहेत आणि त्यांना सातत्याने सैध्दांतिक किंवा मूलभूत शास्ञीय ज्ञानाची जोड घ्यावी लागते Physics, Chemistry, Botany, Biology ही ती शास्ञे होत.आयुर्वेदालाही सुरवातीच्या काळात या शास्ञांची जोड होतीमाञ त्या शास्ञांना त्या काळात Physics हे नाव नसेलChemistry हे नाव नसेलत्याकाळातले Basic Sciences म्हणजे आपले सांख्यवैशेषिक न्याय इत्यादीसारखे शास्ञीय ग्रंथते अध्यात्मिक नसुन भौतिक वादिचे होतेपण हे कळूशकेल असा, Physics, Chemistry, संस्कृत व Philosophy असे चारही विषय शिकलेला विद्यार्थी वर्ग आपल्याकडे कुठे आहे किंवा अशा सारखाविद्यार्थी वर्ग तयार व्हावा या दृष्टीने शिक्षण क्षेञात काय प्रयत्न झाले आहेत ? आपल्याकडील सांख्य इत्यादी विषयांच्या मदतीशिवाय आयुर्वेद वाढू शकलानसतास्थिराऊ शकला नसतापुढे आपल्याकडील Basic Science चा अभ्यास खुंटला तसे आयुर्वेदात पण नवीन काही निर्माण होऊ शकले नाही.आज उद्या आयुर्वेदात काही करायचे असेल तर Physics व Chemistry ला बाजुला ठेउन कसे चालेलपण आज ते अट्टाहासाने करतोथर्मामीटर,स्टेथोस्कोपएक्स रेही उपकरणे Physics च्या अभ्यासातुन तयार झालीअॅलोपॅथीमध्ये ती वापरुन चालतातमग आयुर्वेदात का नाही ? 

  इंजेक्शनची सिरिज हा Physics मधला अविष्कार आहे तीच गोष्ट सलाईनचीमग आयुर्वेदातील काही अत्यंत गुणकारी औषधे जास्त प्रभावी होण्यासाठी इंजेक्शनकिंवा सलाईनमधून का देत नाहीत ? रक्तातील साखर तपासणे हा Chemistry चा विषय आहेसमजा एखाद्या आयुर्वेद्याने कफपित्तवातप्रकृतीचेप्रत्येकी दहा दहा निवडून एका ठराविक आयुर्वेदिक औषधाने त्यांना कसा कसा गुण आला व प्रकृतिप्रमाणे त्यांच्या प्रतिसादात काय काय फरकपडला हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळा ब्लड शुगरची तपासणी केली तर हा प्रयोग अॅलोपॅथीक ठरतोतो मान्य किंवा अमान्य ठरवण्याचा अधिकार ICMR या अॅलोपॅथी रिसर्चच्या संस्थेला मिळतोभलेही त्यांच्याकडील कुणालाही कफपित्तवातप्रकृती म्हणजे काय ते कळत असो अगर नसो.किंबहुना असले प्रयोग केले तर त्यांना 
ICMR मध्ये कुठेही वैज्ञानिक म्हणून मान्यता नसल्याने हा प्रयोग अवैज्ञानिक ठरवला जाईलमाञ हाच प्रयोग एका MBBS डॉक्टरने केला तर त्याच्याकडे आयुर्वेदाची डिग्री नसूनही 'काय त्याला आयुर्वेदाचे ज्ञान आहे हो
असे म्हणून त्याची वाहवा होतेहा अवैज्ञानिकपणाचा जो ठपका जो शासनाने आणि समाजाने आयुर्वेदावर ठेवलाजो अॅलोपॅथी सिस्टमने हिरीरीने कायम  टिकवून धरला व जो आयुर्वेदाच्या डॉक्टारांनी अत्यंत आगतिकपणाने स्वीकारला तो ठपका काढला जाईपर्यंत तसेच आयुर्वेदाची सांगड आधुनिक काळातील Physics, Chemistry सारख्या शाञ्यांबरोबर घातली जाईपर्यंत आयुर्वेदात गतिमानता येणार नाही आणि तोपर्यंत आयुर्वेदाचा उपयोग समाजाला होणार नाही. यासाठी आयुर्वेदाची वेगळी शाखा काढणे गरजेचे नसून स्वास्थ योजनेमध्ये आयुर्वेदाचा समावेश करून घेणे गरजेचे आहे. प्रथमावस्थेत मोतीबिंदू जर जर आयुर्वेदिक औषधाने बरा होऊ शकतो तर महागडी ऑपरेशन्स कशाला ? पण यासाठी शासकीय योजनेत आयुर्वेदातचा समावेश होणे गरजेचे आहे. आज जे सचिव सर्व दवाखान्यांचा कारभार सांभाळतात. तिथे डॉक्टर्स किती आणि काय क्वालिफिकेशनचे द्यावे, तिथे उपकरणे कोणती, औषधी कोणती आणि किती द्यावी इत्यादी ठरवतात त्या सचिवांपेक्षा वेगळ्या तरी अन्य सचिवांच्या कार्यकक्षेत आयुर्वेद हा विषय असतो. त्यामुळे लोकांना त्यांच्या रोगावर आयुर्वेदाची चांगली औषधे उपलब्ध झाली किंवा न झाली काय) आरोग्य खात्याच्या सचिवांना त्याबद्दल काहीही माहिती वा आस्था नसते आणि असेलंच तरी आयुर्वेदाचा नेमका वापर करून घेण्याच्या दृष्टिने अधिकारीही नसतात. तेव्हा पाच लाख MBBS डॉक्टर्सच्या पाठीमागे जेवढी मेडिकल कॉलेजेस आहेत. जेवढी शासकीय यंञणा आहे. तेवढी आयुर्वेदासाठी द्या, ही मागणी चुकीची आहे. सरकारनेही ती दिली म्हणून 'आम्ही आयुर्वेदाचा किती विकास केला' हा तोरा मिरवणे चुकीचे आहे. मुख्य मुद्दा असा की, लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी ज्या सरकारी योजना आहेत. मग त्या मोतीबिंदू निर्मूलन असेल, परिवार नियोजन असेल, कुपोषण थांबवणे असेल, मलेरिया, टाइफाईड, गोवरासारख्या रोगांबाबत असेल त्या त्या योजनेमध्ये आयुर्वेदाचा प्रत्यक्ष सहभाग होत नाही तोपर्यंत आयुर्वेदाचा विकास होणार नाही व सर्वांना आरोग्य ही घोषणासुध्दा पूर्ण होणार नाही.   
-------------------------------------------------------  




सूर्यनमस्कार -- चित्र