सोमवार, 27 जुलाई 2009

Cancer information

CANCER - The whole story



There are two types of Cancer..

1. Benign

2. Malignant



Benign is an early stage , known as Tumour and

Malignant is an advanced stage , which is fatal.



Every person has cancer cells in the body. These cancer cells do not show up

in the standard tests until they have multiplied to a few billion.

When doctors tell cancer patients that there are no more cancer cells in their bodies

after treatment, it just means the tests are unable to detect the cancer cells

because they have not reached the detectable size.



These cancer cells can be detected by the PAP'S TEST or KAPOSI TEST,

No Matter how much they are in numbers

(If there is only one, then it will be detected).

In this mutation in telomerase enzyme, is tested. (Dr. Mani Verma)



Cancer cells occur between 6 to more than 10 times in a person's lifetime.

When the person's immune system is strong the cancer cells will be destroyed

and prevented from multiplying and forming tumours.



When a person has cancer it indicates the person has multiple nutritional deficiencies.

These could be due to genetic, environmental, food and lifestyle factors.

To overcome the multiple nutritional deficiencies,

changing diet and including supplements will strengthen the immune system.



Chemotherapy involves poisoning the rapidly-growing cancer cells and also destroys

rapidly-growing healthy cells in the bone marrow, gastro-intestinal tract etc,

but can cause organ damage, like liver, kidneys, heart, lungs etc.



Radiation while destroying cancer cells also burns, scars and

damages healthy cells, tissues and organs.



Initial treatment with chemotherapy and radiation will often reduce tumour size.

However prolonged use of chemotherapy and radiation do not result in more tumour destruction.



When the body has too much toxic burden from chemotherapy and radiation

the immune system is either compromised or destroyed,

hence the person can succumb to various kinds of infections and complications.



Chemotherapy and radiation can cause cancer cells to mutate and become resistant

and difficult to destroy. Surgery can also cause cancer cells to spread to other sites.



An effective way to battle cancer is to starve the cancer cells by not feeding it

with the foods it needs to multiply.



CANCER CELLS FEED ON:

a. Sugar is a cancer-feeder. By cutting off sugar it cuts off one important food supply

to the cancer cells. Sugar substitutes like NutraSweet, Equal,Spoonful, etc are made

with Aspartame and it is harmful.

A better natural substitute would be M�nuka honey or molasses

but only in very small amounts.

Table salt has a chemical added to make it white in colour.

Better alternative is Bragg's aminos or sea salt.

b. Milk causes the body to produce mucus, especially in the gastro-intestinal tract.

Cancer feeds on mucus. By cutting off milk and substituting with unsweetened

Soya milk cancer cells are being starved.



c. Cancer cells thrive in an acid environment. A meat-based diet is acidic and

it is best to eat fish, and a little chicken rather than beef or pork.

Meat also contains livestock antibiotics, growth hormones and parasites,

which are all harmful, especially to people with cancer.

d. A diet made of 80% fresh vegetables and juice, whole grains, seeds, nuts and

a little fruits help put the body into an alkaline environment.

About 20% can be from cooked food including beans.

Fresh vegetable juices provide live enzymes that are easily absorbed and reach down

to cellular levels within 15 minutes to nourish and enhance growth of healthy cells.

To obtain live enzymes for building healthy cells try and drink fresh vegetable juice

(most vegetables including bean sprouts) and eat some raw vegetables 2 or 3 times a day.



Enzymes are destroyed at temperatures of 104 degrees F (40 degrees C).

e. Avoid coffee, tea, and chocolate, which have high caffeine.

Green tea is a better alternative and has cancer-fighting properties.
Water-best to drink purified water, or filtered, to avoid known toxins and heavy metals

in tap water.



Distilled water is acidic, avoid it.


Meat protein is difficult to digest and requires a lot of digestive enzymes.

Undigested meat remaining in the intestines become putrefied and leads to

more toxic build-up.

Cancer cell walls have a tough protein covering.

By refraining from or eating less meat it frees more enzymes

to attack the protein walls of cancer cells and allows the body's killer

cells to destroy the cancer cells.

Some supplements build up the immune system

(IP6, Flor-ssence, Essiac, anti-oxidants, vitamins, minerals, EFAs etc.)

to enable the body's own killer cells to destroy cancer cells.

Other supplements like vitamin E are known to cause apoptosis,

or programmed cell death, the body's normal method of disposing of

damaged, unwanted, or unneeded cells.

Cancer is a disease of the mind, body, and spirit.

A proactive and positive spirit will help the cancer warrior be a survivor.

Anger, unforgiveness and bitterness put the body into a stressful and acidic environment.

Learn to have a loving and forgiving spirit. Learn to relax and enjoy life.

Cancer cells cannot thrive in an oxygenated environment.

Exercising daily, and deep breathing help to get more oxygen down to the cellular level.

Oxygen therapy is another means employed to destroy cancer cells.

गुरुवार, 7 मई 2009

आरोग्याची चतु:सूत्री (लेखांक 10)

आरोग्याची चतु:सूत्री  (लेखांक 10)

आरोग्य कायम ठेवण्याची चतु:सूत्री आहे - आहार, विहार, आचार आणि विचार. विचारांचा देखील अंतर्भाव यामधे होत असल्याने तत्त्वज्ञान व तत्त्वज्ञता हे आरोग्य रक्षणाचा कणा आहेत असे मला वाटते.

आपले विचार कसे असतात, आपले आचरण त्याप्रमाणे असते की नसते यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. विचार आणि आचार यांच्यामध्ये फरक पडल्याने मोठे ताण तणाव निर्माण होतात. त्यामुळे रक्तदाब, दमा, ह्दयरोग इतकेच नाही तर कॅन्सर सारखे रोगही होऊ शकतात असं आता अत्याधुनिक शास्त्रज्ञ मानू लागले आहेत. आयुर्वेदात मन या संकल्पनेवर बराच विचार केला असून स्मृति, बुध्दि, मेधा, प्रज्ञा, ज्ञान, विवेक या प्रत्येक भावनेचे स्वरूप वेगवेगळे ठरवले आहे - त्यांची कामे देखील वेगवेगळी ठरवली आहेत. ते ते काम न झाल्याने मनावर नेमका विपरीत परिणाम काय होतो व रोग उत्पत्ति कशी होते याचाही उहापोह भारतीय दर्शन शास्त्र, बुध्द व महावीर कालीन ग्रंथ तयेच आयुर्वेद यामधे - ठिकठिकाणी केला आहे. या दृष्टिने भगवान बुद्घांची कहाणी अत्यंत मनोहारी आहे. रोग, जरा (म्हातारपणा) आणि मरण यांच्या क्लेशातून माणसाला मुक्ति कशी मिळेल हे शोधायला निघालेले कुमार गौतम मुक्तिचा शोध पूर्ण करतात त्याच क्षणी त्यांना बोधिसत्त्व पद प्राप्त होते. नंतर ही मुक्ति व हे बोधिसत्वपद इतरांना कसे मिळू शकेल याची चर्चा करतांना भगवाना बुद्घांनी शील या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यात मन, वाचा व कर्म यामधे समशील राखण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनाने वाईट विचार करणार नाही, चांगले विचार करीन हे मनाचे शील, वाचेने कुणाचे वाईट बोलणार नाही किंवा कुणाला दुखावणार नाही हे वाचेचे शील, विचारांप्रमाणेच वागेन हे कर्माचे शील, असे मनसा, वाचा, कर्मणा एकच शील ठेवणे ही रोग आणि दु:खापासून मुक्ति मिळण्याची पहिली पायरी आहे असे भगवान बुद्घ सांगतात. जग कसेही वागत असेल, माझ्याकडे बघत असेल अगर नसेल परंतू माझे शील अबाधित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे कारण माझ्या रोग-दु:ख-मुक्तिसाठी, माझ्या बोधिसाठी ते आवश्यक आहे. सत्यावर दृढ रहावे असे सर्वच धर्म सांगतात. परंतू त्याची मन, बुद्घि, कर्म अशा वेगवेगळ्या पातळीवर फोड करून, त्याला शील हा वेगळा शब्द वापरून त्याचा आपल्या रोगी - निरोगीपणाशी संबंध कसा आहे याचे खोलवर विवेचन भगवान बुद्घांनी केले आहे.

याठिकाणी मला फिजिक्सच्या एका सिद्घान्ताची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. हा सिद्घान्त अस सांगतो की कोणतीही सिस्टम एका स्थितीकडून दुस-या स्थितीकडे जात असतांना ज्या मार्गावर सिस्टम मधील ऊर्जेचा व्यय कमीत कमी असेल त्याच मार्गाचा सिस्टम स्वीकार करील. थोडक्यांत ऊर्जेचा व्यय कमीत कमी ठेवणे ही निसर्ग-प्रवृत्ति आहे. ????? आपण विचाराने एक असेल असे मला वाटत नाही. ????? म्हणूनच कैवल्याची अवस्था वर्णन करतांना आनंदाचे डोही आनंद तरंग असे त्याचे वर्णन केले आहे.

असे समाधान लाभण्यासाठी उदार व क्षमाशील मन, ऋजु - मृदू वाणी आणि निर्वैर भाव याही गुणांची आवश्यकता आहे.

एकूणच विचार आणि आचार या दोन बाबींना आरोग्य रक्षणासाठी फार महत्त्वाचे मानले आहे. दुदैवाने ही वैचारिकता आरोग्य किंवा आयुर्वेद या सदराखालून बाजूला निघून धार्मिकता या सदराखाली आली. पुढे धर्म व तत्त्वज्ञान हे देखील आचरणाची बाब न रहाता फक्त पोथी व चर्चेतील बाबी झाल्या. त्याही पुढील काळात धार्मिकता या मूळच्या उदात्त कल्पनेला जे क्षुद्रत्चाचे कंगोरे जोडले गेले, त्यामुळे धर्म या मूल्यवान संकल्पनेचे मूल्यच हरवून बसले आणि त्याचा आपल्या आरोग्याशी कांही संबंध असू शकेल हेच आपल्याला आज तर्कसंगत वाटत नाही.

प्रसन्नचित्तता व विशाल अंत:करण यावे यासाठी महात्मा गांधीनी त्यांच्या निसर्गोपचारावरील पुस्तकात एक अगदी सोपा उपाय सांगितला आहे व त्याची प्रचीतीही मी घेतलेली आहे. जमेल तेंव्हा घरातल्या बंद खोलीत न झोपता मोकळ्या आकाशाखाली झोपावे हा तो उपाय. अवश्य करून पहावा असा माझा अनुभव सांगतो.

बोलण्यात दुसरे व आचरणात तिसरे असे जेंव्हा करतो तेंव्हा एकाच मुद्दावर आपल्या मेंदूची तिप्पट ऊर्जा आपण वापरीत असतो. त्याऐवजी समशीलता ठेऊन वागल्यास मेंदूला प्रत्येक वेळी वेगळा आदेश, वेगळी पूर्तता व वेगळी ऊर्जा पुरवठा करण्याची गरज रहाणार नाही व ऊर्जेचा व्यय कमीत कमी होईल. त्यामुळे रोग होण्याला कमीत कमी वाव राहील.

म्हणून निसर्गोपचाराचा मार्ग पत्करून ज्याला रोगमुक्ति हवी त्याने खरेपणाने बोलले व वागले पाहिजे अन्यथा रोगमुक्ति अशक्य आहे असे माझे ठाम मत आहे.

निरोगीपणासाठी आचार - विचाराला आणखीन एक मनोगुण आवश्यक आहे तो म्हणजे प्रसन्नचित्त असणे. मी एकदा एका तणाव-मुक्ति शिबीराचे माहिती पत्रक पाहिले. त्यावर लिहिले होते –
“जर तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी असे घडत असेल की,
1. एक मिनिटभर तरी तुम्ही खळखळून हसू शकलात आणि
2. एक क्षण तरी असा आला जेंव्हा तुम्हाला वाटल की या क्षणी मी पूर्ण समाधानी, तृप्त व आनंदी आहे
तर तुम्हाला आमच्या शिबिरात येण्याची गरज उरली नाही असे खुशाल समजा”

तणाव मुक्तिचा एवढा अचूक मार्ग इतर कोणता?


--- XXX ---

शुक्रवार, 24 अप्रैल 2009

निसर्गोपचाराची सैध्दान्तिक बैठक ( लेखांक 10 perhaps)

भाग-? निसर्गोपचाराची सैध्दान्तिक बैठक

निसर्गोपचाराचे कांही मुख्य सिध्दान्त आहेत व ते ऍलोपथीपेक्षा बरेच वेगळे आहेत. हे आयुर्वेद, होमियोपथी या शास्त्रांना जास्त जवळचे आहेत.

निसर्गोपचाराचा पहिला सिध्दान्त हा कि रोग होतो तो शरीराच्या एखाद्या अवयवाला होत नसून संपूर्ण शरीराला समग्रपणे रोग होत असतो. म्हणूनच रोगाचा उपचार करतांना संपूर्ण शरीराचा विचार झाला पाहिजे. इतकेच नाही तर रोग्याच्या मानसिक व भावनिक स्थितीचा देखील विचार झाला पाहिजे.

रोगाचे प्रकटन व प्रदर्शन हे शरीराच्या एखाद्या अवयवातून होत असते. याचा अर्थ तो अवयव आजारी आहे असा नसून आजार हा पूर्ण शरीराचाच असतो. फक्त रोग प्रकट होण्याचे निमित्त व जागा वेगवेगळ्या असू शकतात. म्हणूनच रोगावर उपाय करतांना संपूर्ण शरीर हे एक युनिट आहे असं मानून उपाय करावा लागतो. अवयवाच्या दुखण्यावर केलेला उपाय हा ताप्तुरता इलाज असतो. तो तेवढाच मर्यादित ठेवला व इतर दीर्घकालीन उपाय केले नाहीत असे चालत नाही. त्याचप्रमाणे उपाय देखील एकत्रितपणे संपूर्ण शरीरावर करायचा असल्याने कित्येक आजारपणांना एकच उपाय आहे असेही दिसून येते. संधिवात किंवा स्पॉण्डिलायटिस असेल तर मातीची पट्टी किंवा चादर स्नान हाच उपाय आणी डायबिटिसला देखील तोच उपाय, तेच पथ्य, तोच व्यायाम असं कसं हे आश्चर्य कांहींना वाटत असतं, त्याचं उत्तर यामधे आहे.

निसर्गोपचारातील दुसरा विचार म्हणजे रोग कसा होतो ? आयुर्वेदाप्रमाणे रोग या शब्दाची उत्पत्ती रूक्‌ या धातुपासून झाली आहे. रूक्‌ म्हणजे जाणीव करून देणे. तेंव्हा आपल्या शरीरामधे बिघाड झाल्याची जाणीव करून देतो तो रोग. हा रोग शरीरात सूक्ष्म किंवा स्थूल रूपात कचरा साठून राहिल्याने होतो. आपल्या शरीराच्या आंत जे जे कांही प्रवेश करते त्यामुळे कचरा साठू शकतो. या व्याख्येमधे फक्त अन्न व पाणी एवढेच घटक मोडतात असे नाही. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे भूमि, आप (पाणी), तेज, वायु, आकाश याचबरोबर मन, बुध्दि आणि अहंकार अशी आठ घटक तत्त्वे मिळून माणूस तयार होतो.
भूमिरापोsनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।।
म्हणून आपण कांय खात पितो, तसच आपलं मन कसं वागत, बुध्दि व अहंकार कसे वागतात, आपण चिडतो, त्रागा करतो, ईर्ष्या, द्वेष, लालसा, मोह, मिथ्यावाणी, अहंमन्यता, काम, क्रोध, दुर्बुध्दि, काळजी, चिंता, संशय इत्यादि सर्वांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. रोगाच्या माध्यमातून शरीर आपल्याला सांगत असते की शरीरात कांही तरी अवांछित असे साठून रहात आहे. ते काढून टाकण्याची काळजी घ्या. म्हणूनच रोगाला शत्रू मानू नये किंवा घाबरू नये.

तिसरा विचार असा आहे कि ऍलोपथी किंवा आयुर्वेदातील दमन चिकित्सेमधे रोगाच्या लक्षणांवरून तत्काळ दाबून टाकणारे औषध आधी दिले जाते. याचा अर्थ शरीराला जो कचरा बाहेर काढायचा होता तो निघण्याचा मार्ग आपण तात्पुरता थांबवला. ही झाली इमर्जन्सी मॅनेजमेंट. कित्येकदा ही गरजेची असते जेणेकरून शरीराला शॉक बसू नयेत. तरी पण ती तशी करण्याची गरज आहे का हे जाणीवपूर्वक ठरवायला हवे. यासाठी रोगी व डॉक्टर यांच्यामध्ये सुसंवादही हवा. मात्र लक्षणे थांबवून आपण रोग बरा झाला अशी समजूत करून घेतली आणी शरीरात दाबून टाकलेला कचरा निघून जाण्यासाठी पुढे कांहीच केले नाही, व शरीरालाही ते नैसर्गिक प्रक्रियेतून जमले नाही, तर हे दाबून ठेवलेले रोग पुढे इतर उग्र रोगात बदलतात. यासाठी आणी दमन चिकित्सेतील उग्र औषंधाचे इतर दुष्परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदात पथ्य योजना करावी लागते. म्हणजे पुन: ती चिकित्सा किचकट व सामांन्याच्या आवाक्याबाहेरची ठरते. तरी पण पथ्य न करण्यापेक्षां ते बरे.

शरीरात साठलेल्या कच-यातून टॉक्सिसिटी किंवा सूक्ष्म कच-याची निर्मिती होऊन दीर्घकालीन आजार उदाहरणार्थ संधिवात, स्पाण्डिलायटिस, दमा, डायबेटिस इत्यादि होतात असा निसर्गोपचाराचा सिध्दान्त आहे. तर मग हा साठलेला सूक्ष्म कचरा केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा किंवा जसा टप्प्याटप्प्याने हा साठत गेला त्याच्या मधल्या स्टेजचे केमिकल ऍनॅलिसिस करून दाखवा असा प्रश्न विचारला तर असले कांही प्रयोग कुणी निसर्गोपचारक करून दाखवू शकणार नाही. मात्र कचरा काढायचे उपाय करते राहिल्याने हे रोग बरे होतात असा निष्कर्ष कित्येक ब-या केलेल्या रोग्यांच्या आधारे निघू शकतो. त्यामुळे मी वर वर्णन केलेल्या एकूण सैध्दान्तिक विवेचनाच्या जोडीला रोग्याबाबतची केस हिस्टरी ठेऊन व शास्त्रशुध्द रीतीने प्रयोग करून कांय निष्कर्ष निघतात ते तपासण्याची गरज आहे. असे शास्त्रशुध्द प्रयोग करणे, त्यांची हिस्टरी ठेवणे, त्यांच्या निष्कर्षांची चर्चा व देवाण-घेवाण करणे, थोडक्यात ज्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचे शास्त्र म्हणतात ते शास्त्र शिकून घेणे हेही आयुर्वेद किंवा निसर्गोपचाराच्या दृष्टिने गरजेचे आहे.
देहशुध्दिसाठी निसर्गोपचारांत प्रत्यक्ष केले जाणारे उपाय आयुर्वेदाचे चिकित्सक कधीच वापरून बघत नाहीत. फक्त त्यांच्या ग्रंथांत या उपायांची माहिती किती चांगली, किती सुसूत्र व किती प्रदीर्घ मांडली आहे ते उतारे वाचून दाखवतात. त्यामुळे आयुर्वेद व निसर्गोपचार यात नेमका फरक माझ्या मते असा की,

निसर्गोपचार = स्वस्थवृत्त व शमन, चिकित्सेपैकी थोडक्याच उपायांचे पुस्तकी ज्ञान पण प्रत्यक्ष वापर ‘शंभर टक्के’.

आयुर्वेद = स्वस्थवृत्त व शमन चिकित्सेचे भरपूर पुस्तकी ज्ञान पण प्रत्यक्ष वापर आणि अनुभवसिद्धी शून्य. त्याऐवजी दमन चिकित्सेवर भर.

आयुर्वेदातील फक्त शमन चिकित्सेचा शास्त्रोक्त वापर अतिशय कौशल्याने करणारे सुमारे 200 खाटांचे पंचकर्म चिकित्सालय पुदुकोट्टई (केरळ) येथे आहे. ते मात्र मेडिकलच्या सर्वच शाखांच्या जिज्ञासूंनी पहाण्यासारखे आहे.
निसर्गोपचार सांगतो की रोग झाल्यास सर्वप्रथम शरीराची एकूण कचरा विसर्जनाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करा. पूर्वी सर्वच डॉक्टर आजारी माणसास अगोदर पोट साफ होण्यासाठी औषध देत असत. कित्येक लहान मुलांमधे आपल्याला ही नैसर्गिक प्रक्रिया पहायला मिळते की ताप आल्यावर त्यांना एक-दोन वेळा उलटी होऊन आराम पडतो. मला स्वत:ला ताप आल्यास मी दिवस भर घोट-घोट पाणी पीत राहणे हे तंत्र वापरते. शिवाय सर्दी होण्याच्या सुरूवातीला नाडीशुध्दी प्राणायामाचा उपाय हमखास लागू पडतो. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी व मधले बोट आणि अनामिका यांनी डावी नाकपुडी बंद करायची. नंतर मनात सारखे आकडे मोजून आधी डाव्या नाकपुडीने चार पर्यंत आकडे मोजत श्वास घ्यायचा, मग उजव्या नाकपुडीने चार पर्यंत आकडे मोजत श्वास सोडायचा, नंतर लगेच तेवढेच आकडे मोजत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा व तेवढेच आकडे मोजत तो डाव्या नाकपुडीने सोडायचा. आकड्यांची संख्या चार वरून वाढवत दहा - पंधरा पर्यंत नेता येते. सकाळ, संध्याकाळच्या संधी-प्रहरात तसेच दुपारी व मध्यरात्री सुमारे एक तास आपला श्वास दोन्हीं नाकपुड्यांतून चालू असतो याला समश्वास म्हणतात. एरवी तो फक्त एकाच नाकपुडीतून चालतो. समश्वासाच्या काळात नाडीशुध्दि जास्त लाभकारी ठरते. एरवी नाकाची स्वाभाविक गति एकाच नाकपुडीतून असल्यामुळे नाडीशुध्दि करतांना त्रास होऊ लागला तर करू नये. सवयीने समश्वासाचा काळही वाढवता येतो.
शरीरातील कचरा जेंव्हा मल मूत्र, घाम व उच्छ्वास या वाटे कार्यक्षमतेने निघून जात नाही तेंव्हा कांय होते? ते पुढल्या लेखांत पाहू. शरीर स्वत:च जाणीवपूर्वक कांही वेगळे उपाय शोधू लागते. यामुळे अनुक्रमे जुलाब व उलटी, ताप येणे, त्चचेचे रोग, श्वासाचे रोग इत्यादि होऊ लागतात. अशा प्रक्रियेला थांबवण्याचा किंवा दमन करायचा प्रयत्न करण्याऐवजी वेगळे पर्याय आहेत. होमियापथीचा पर्याय असा की शरीराने देहशुध्दिचा निवडलेला नवा मार्ग बरोबर असून त्याच मार्गाने पूर्ण निचरा होऊन जाऊ द्या. यासाठी जे औषध देण्यात येते त्याने सुरूवातीला मूळ रोगाची लक्षणे वाढू लागतात व मगच थांबतात असे आपण बघतो. आयुर्वेदातील शमन चिकित्सेत लक्षणाविरूध्द अतिशय सौम्य व बहुधा आपल्या मसाल्यातील गोष्टी किंवा घराभोवतालच्या वनस्पतींचा वापर केला जातो.
{निसर्गोपचारात देखील लक्षण विरोधी करण्याचा प्रयत्न केला जातो. Sameer, something wrong. Pl sp}










--- XXX ---

गुरुवार, 23 अप्रैल 2009

भाग-? कांही अनुभव व ठोकताळे (लेखांक 5 perhaps)

भाग-? कांही अनुभव व ठोकताळे
बरेचदा आजारपण असतांना एखाद्या पुस्तकी उपायाऐवजी मी वेळोवेळी अनुभव घेतलेले कांही सोपे सोपे उपाय करते. हे उपाय करून बघतांना मी एक तंत्र वापरते ते असे - आपल्याला नेमकं कांय होतय हे आधी चांगल्या डॉक्टर कडून समजून घ्यायचे. त्यात पुढील दोन दिवसात काय काय कॉम्प्लीकेशन होणार आहेत. दोन दिवसात रोग कमी झाला नाही तर काय करायचे हे सर्व डॉक्टर बरोबर आधी बोलून ठेवायचे. मग सुरूवातीचा थोडासा त्रास सोसायची मनाची तयारी ठेवायची आणि हे असले सोपे-सोपे उपाय करून बघायचे.
यातून अनुभव जसा जसा वाढत जातो तशी तुमची औषधांची गरज कमी होऊन तुम्ही आपल्या रोगाला हँडल करू शकता. अस छोट्या छोट्या अनुभवातून निसर्गोपचाराचे ज्ञान समृध्द करता येतं. मिळालेल्या थोड्या थोड्या ज्ञानाचा वापर करता येतो. एम्‌.बी.बी.एस्‌ सारखं चार साडेचार - पाच वर्ष थांबून रहावा लागत नाही. मात्र डिग्रीपण मिळत नाही. पण स्वत:ला बरं करण्यासाठी डिग्री कशाला लागते ? हे आपलं माझं माझ्यापुरतं तत्वज्ञान.
एकदा मला खूप खोकला होऊन घसा खूप दुखू लागला. थंडीचे दिवस - मी दिल्लीत रेस्ट हाऊस मधे - आणि जवळ औषध काही नाही. मग गरम पाण्यात टॉवेल बुडवून गळ्याभोवती लपेटला आणि त्यावर दोन कोरडे टॉवेल लपटले. दहा पंधरा मिनिटात आराम पडला. हेच तीन चार तासांनी करत राहिल्यावर दुस-या रात्री पर्यंत खोकलाच थांबला होता.
सर्दी पडस्‌ किंवा ताप आल्यावर तर हटकून मी एक करते. दर पांच दहा मिनिटांनी घोट घोट पाणी पीत रहाणे. एरवी औषध न घेतले तर सात दिवसांत आणि औषध घेतल तर एकाच आठवड्यांत बरी होणारी सर्दी माझी दोन दिवसांत बरी होते. शिवाय वारंवार सर्दी होण्याची फ्रिक्वेन्सी कमी होते ते वेगळेच. किरकोळ तापात देखील मला याच्या पलीकडे जास्त औषध घ्यावं लागत नाही की रजा काढावी लागत नाही.
आपल्या खाण्यांत कांही उलट सुलट झालं किंवा कधी परक्या गांवी जाऊन पाणी बदलल की आपल्याला डिसेंट्री होते. अशावेळी मी भरपूर पाणी पिते. फारच त्रास असेल तर भरपूर बडीशोप पण खाते. हे मी पंधरा वीस वर्षे अनुभवले. आता तर डिसेंट्रीत मीठ-साखर-पाणी घ्या, पाण्याचा इनटेक वाढवा, अस नेहमीच सांगितलेलं आपण ऐकतो.
--- XXX ---
दै. गांवकरी नाशिक,
मंगळवार दि. ???

शुक्रवार, 27 मार्च 2009

भाग-1 - निसर्गोपचाराचे मर्म

अनुभवातला निसर्गोपचार
भाग-1 - निसर्गोपचाराचे मर्म
मंगळवार दि. 28 जानेवारी, 1997
दै. गांवकरी, नाशिक - लेखांक 2.
kept on son_denare_pakshi
निसर्गोपचार हा एकविसाव्या शतकातील काळाची गरज ठरणार आहे, आणि पर्यावरणाच्या प्रश्नाशी हा निगडीत राहणार आहे.
अगदी ढोबळ मानाने निसर्गोपचार म्हणजे काय याचे उत्तर असे की एखाद्या रोगावर औषध न घेता निसर्गात उपलब्ध असलेले पाणी, माती, सूर्यप्रकाश हे घटक वापरून व आहारात योग्य प्रकारे बदल करून केलेली चिकित्सा. पण निसर्गोपचाराचे खरे मर्म असे आहे की आधी रोग्याच्या विचारसरणीत योग्य तो बदल होणे गरजेचे असते.
याबाबत माझे दोन अनुभव सांगण्या सारखे आहेत. एका सुट्टीत माझ्या बहिणीची मुलगी वय 12 व भावाची मुलगी वय 5 आमच्याकडे रहायला आल्या. मोठ्या भाचीला कांहीतरी ऍलर्जी होती. मधूनच पित्ताच्या गाठी यायच्या. त्यावेळी डॉक्टर असलेली तिची आई कसलेसे इंजेक्शन देत असे. पण ही सोय माझ्या घरी कुठून असणार ? एक दिवस तिला पित्ताच्या गाठी आल्याच. हातावर, पाठीवर आणि तोंडावर. तिने रडून आत्ताच्या आत्ता ते इंजेक्शन शोधून मला दे असा धोशा लावला. तेंव्हा तिला समजावलं आणि सध्या तात्पुरता माझा उपाय कर, तो पर्यंन्त मी कोणीतरी डॉक्टर बघते - पण त्याला अर्धा तास लागेल अस सांगितलं. तिला झोपवल आणि माझा उपाय म्हणजे खूपसे रूमाल पाण्यात ओले करून तिच्या गाठींवर ठेवून दर पाच मिनिटाला रूमाल बदलून पुन: पाण्यांत पिळून घ्यायला सांगितला. इकडे तिच्या नेहमीच्या इंजेक्शनची माहिती पण घेतली. मात्र पंधरा मिनिटात तिचा त्रास खूपच कमी झाला होता. मग इंजेक्शन द्यावेच लागले नाही. यानंतर एकदा छोट्या भाचीला पण तशाच गाठी उठल्या तेंव्हा मी तिला चक्क ओल्या चादरीत गुडाळून वर ब्लँकेट पांघरूण घालून झोपायला सांगितले. आधीचा प्रयोग पाहिलेला असल्याने ती तयार झाली आणि बरी पण झाली. पुढे माझ्या मोठ्या भाचीला तिच्या घरी दोन वेळा हाच त्रास झाला तेंव्हा तिने इंजेक्शन न घेता थंड पाण्याचा हाच उपाय केला आणि आता गेल्या चार वर्षात तिला हा त्रास झालेला नाही.

या प्रयोगात दोन तीन महत्वाचे मुद्दे होते. झालेल्या गाठी पित्ताच्याच असून एखाद्या मोठ्या गंभीर आजाराच्या नाहीत हे मला ओळखता येत होते - त्यावरचा पाण्याचा हा प्रयोग आधी अनुभवलेला नव्हता पण माहीत होता. मात्र थंड पाण्याने इतर बरेचदा गुणकारी प्रत्यय दिले होते, ते अनुभवातले होते. त्या मुलींना माझ्याबद्दल बराच विश्वास होता. धाकट्या भाचीच्या तर डोळ्यांसमोरच उदाहरण घडल्यामुळें प्रयोग करून बघायला ती पटकन तयार झाली होती. आता माझ्या बहिणीने देखील निसर्गोपचाराची बैठक समजावून घेतलेली आहे. आणि मुळात डॉक्टरच असल्याने ती या ज्ञानाचा माझ्यापेक्षाही खूप चांगला वापर तिच्या व्यवसायात करून घेऊ शकते.
दुसरे उदाहरण मी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे या निसर्गोपचार संस्थेत डायरेक्टर असतानाचे आहे. आम्ही पुण्यातील सुमारे 25 ते 30 मधुमेहाचे रोगी घेऊन त्यांच्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला. दर बुधवारी 2 तास असा 12 आठवड्याचा एक कोर्स ठेवला. यामधे मुख्य कार्यक्रम असायचा रोग्यांची आपापसात चर्चा व अनुभवांची देवाण - घेवाण. शिवाय कांही तज्ञ मंडळींची लेक्चर्स असायची. काय करा, काय टाळा ही चर्चा असायची आणि प्रत्येकाने आपण घेत असलेला इन्सुलिनचा डोस अगदी हळू हळू गतीने पण निश्चितपणे कसा कमी करता येईल हे उद्दिष्ट होते. डोस कधी कसा किती कमी करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे होते. कांही इमर्जन्सी आलीच तर रात्री बेरात्री पण जे धावून येऊन मदत करतील अशा चार डॉक्टरांची यादी तयार ठेवली होती. त्यापैकी फक्त एकाला एका रात्री फोन करून सल्ला विचारावा लागला यापेक्षा वाईट कांही झाल नाही, यावरून सर्व रोगी किती सावकाशीने व संयमाने प्रयोग करीत होते ते कळते. पहिल्या तीन आठवड्यात झपाट्याने बदल व सुधारणा दिसू लागल्या होत्या व तीन महिन्यानंतर हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्याचे त्या रोग्यांनी सांगितले. या काळात आम्ही डायेबेटिस या रोगाचा सर्व बाजूंनी उहापोह केला - मेडिसिन कांय कांय, कॉम्लीकेशन मुळे काय सर्जिकल प्राब्लेम्स येतात, आयुर्वेदातील पथ्यापथ्य, योगासनांची प्रॅक्टीस करून घेणे, चालण्याचा व्यायाम, त्यांत लवकर उठून व मौन ठेऊन चालण्याची गरज, उपवास कसा करावा व करतांना त्यांत कांय टाळावे, फलाहार, शाकभाज्यांचा आहार, थंड पाण्याचे व मातीचे विविध उपचार, मनोवृत्ती, विपश्यना, अँक्युप्रेशर, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करण्याची गरज, त्या मागील विचारसरणी इ. खूप मुद्यांची चर्चा झाली. आहारात देखील मधुमेह कण्ट्रोल करणारे खूप घटक असतात उदा. - मेथी, साळीच्या लाह्या, ताक इत्यादि - त्याच बरोबर घरबसल्या ब्लड किंवा युरिन शुगर टेस्टिंगची बाजारात आलेली नवी उपकरण, त्यांच्या किंमती हे पण चर्चेचे विषय होते. या कार्यक्रमात सहभागी होणा-या व लाभ झालेल्या मंडळींची एक प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती - आता आम्हाला कळलं की आमचा मधुमेह आणि ब्लड प्रेशर दोन्ही काबूत कस ठेवायच - एखादे वेळी आम्ही वागण्यात, खाण्यापिण्यात अतिरेक केला, तर तुम्ही सांगितलेली माहिती वापरून नेमकं काय करून आम्ही रोग पुन: काबूत आणू शकतो हे कळलं.
या रोग्यांना मी एक प्रश्न हमखास विचारीत असे - गोळ्या खाऊनही तुमचा रोग काबूत रहातो व हे सगळे आहार विहारांतील संयम पाळूनही तुम्ही तो काबूत ठेऊ शकता. मग पहिला मार्गचं जास्त सोपा, सुटसुटीत नाही कां? प्रत्येकाने नाही असचं उत्तर दिल. त्याची कारणं अशी -

1. गोळ्या खाल्ल्या तरी थकवा, निरूत्साह, सुस्ती, निगेटिव्ह ऍटिट्यूड टू लाइफ जात नाही.
2. आहार - विहार व विचारातील फरक व संयमामुळे रोग काबूत ठेवतांना आपण या रोगापेक्षा श्रेष्ठ आहोत, जेते आहोत ही आत्मविश्वासाची भावना वाढते.
3. किती संयम व किती औषध यांचा balance कसा बसवायचा ते गणित आम्ही स्वत:च्या अनुभवातून स्वत:चे स्वत:साठी बसवून घेतले आहे - हे गणित प्रत्येकाचे वेगळे असणार प्रत्येकाने ते स्वत:साठी सिध्द करून घ्यावे लागते. इतर रोग्यांपेक्षा आमचा फायदा असा की आमचा तो अनुभव सिध्द झालेला आहे. त्याचा आम्हाला इतर वेळी फायदा होऊ शकतो.
4. निसर्गोपचारातील जे उपाय आम्ही मधुमेह कमी करण्यासाठी वापरले त्याने इतर ब-याच किरकोळ तक्रारी संपल्या वगैरे, वगैरे.
तर सांगायचा मुख्य मुद्दा हा की निसर्गोपचारांचा विचार करतांना पहिली आपली विचारसरणीय बदलावी लागेल. डोळे उघडे ठेवा, मन उघडे ठेवा, नवा विचार समजावून घ्या, प्रयोगाला घाबरू नका. सुरूवातीला थोडा धोका पत्कारून कां होईना पण प्रयोग करून बघा - करा, केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे ! निसर्गोपचार समजून घेण्यासाठी पहिली अट म्हणजे करून बघण्याची तयारी ! हेच निसर्गोपचाराचे मर्म.

--- XXX ---
दै. गांवकरी, नाशिक, दि.

शनिवार, 21 मार्च 2009

19 -- मातीचा वापर basics of Mud therapy

अनुभवातील निसर्गोपचार
भाग - 19
मातीचा वापर
kept on son_denare_pakshi
निसर्गोपचारात मातीचा वापर मुबलकपणाने करतात. माती म्हणजे पृथ्वी तत्त्व. शरीर मातीतून बनलेले असते व मातीतच मिळणार असते. शरीराला मातीचा उपयोग उत्तम प्रकारे होतो. अशी निसर्गोपचाराची मान्यता आहे.

निसर्गोपचारासाठी माती कशी असावी ? ती शक्य तो नदी काठची व सुमारे 1 ते 2 फूट खड्डा खणून मग त्या खड्यातील खालची माती घेतलेली असावी. ही माती मोठ्या चाळणीने चांगली चाळून घेऊन सूर्याच्या उन्हांत तापवून घ्यायची. वापरण्याच्या आदल्या रात्री साधारणपणे आपण कणीक भिजवतो तेवढी पातळ भिजवून एखाद्या पातळ कापडात गुंडाळून शरीरावर पट्टीच्या स्वरूपात वापरतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे पोटावर मातीची पट्टी ठेवणे. यासाठी सुमारे 6 इंच लांब व 4 इंच रूंद पातळ कापडावर मातीचा थर ठेऊन ते कापड पोटावर ठेवतात व वरून जाड टॉवेलची पट्टी गुंडळतात. काही वेळा पोटावरच सरळ मातीचा लेप देऊन वरून टॉवेल गुंडाळण्यात येतो. या शिवाय छोट्या पातळ रूमालात वरील प्रकारेच पाण्यात कालवलेली व फुलवलेली माती गुंडाळून त्या पट्टया डोळ्यांवर सुमारे अर्धा तास ठेवल्याने डोळ्यांना थंडावा व आराम मिळतो. या शिवाय तोंडाला मातीचा पातळ लेप सुमारे अर्धा तास दिल्याने त्वचा नितळ व मुलायम होते. तसेच शरीरातील लोमकूप स्वच्छ राहवेत व त्यावाटे घाम बाहेर पडण्याची प्रक्रिया जास्त कार्यक्षमतेने व्हावी यासाठी महिन्यातून एकदा संपूर्ण शरीरावर 2 ते 3 तास मातीचा लेप देण्यात येतो. असा मातीचा लेप दिलेल्या व्यक्तिला उन्हांत बसवल्याने माती स्नान व सूर्य स्नान या दोघांचेही फायदे मिळतात.

कित्येक तत्कालिक उपचारांकरिता, विशेषत: त्वचेच्या उपचारांकरिता माती चांगल्या त-हेने वापरली जाते. कुठल्याही प्राण्याचा दंश झाल्यास त्यावर मातीचा लेप देणे ही तत्काळ करता येण्यासारखी उपाय योजना आहे. गांधील माशी, मध माशी, सुरवंट या सारखे प्राणी चावल्याने मोठी दाह व पित्ताच्या गाठी तयार होतात. त्यावेळी कुंडीतील ओली माती, झाडाच्या बुंध्याखालील ओली माती किंवा जमिनीतून खणून काढलेली ओली माती पटकन उपयोगी पडते.
माझ्या लहानपणी एकदा वडीलांच्या हाताने एक मोठा विषारी कोळी चिरडला गेला. त्याने संपूर्ण डाव्या हातावर मोठ्या प्रमाणात फोड येऊन अतिशय आग होऊ लागली. ते सर्व
पांढ-या जाड तंतूंनी विणलेल्या कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसू लागले. हाताची किंवा बोटाची हालचाल देखील थांबली. त्यावेळी दोन तीन परिचित डॉक्टरांना एकदमच बोलावले होते. त्यापैकी एका डॉक्टरांनी तात्काळ अंगणातील केळीच्या बुंध्यातील माती उकरून काढली व केळीच्या बुंध्याचे सुपट सोलून त्याच्या आत साचलेल्या पाण्यातच ती माती कालवली व संपूर्ण हातावर लेप दिला. या प्रयोगाने फार लवकर माझ्या वडीलांना आराम पडला. असे म्हणायला हरकत नाही की माझे निसर्गोपचाराचे शिक्षण त्या घटनेपासूनच सुरू झाले. त्यानंतर कित्येकदा सुरवंटाचे केस, गांधील माशी, भुंगे व प्रसंगी विंचू दंश अशाही वेळी आमच्या घरी व नातेवाईकांवर मातीचा उतारा देण्यात आलेला आहे.

माती मध्ये कित्येक प्रकार असतात. काळी माती, चिकण माती, लाल माती, पिवळी माती, नदीतील गाळाची माती, पांढरी माती, मुलतानी माती इत्यादी. या सर्व त-हेच्या मातीचे वेगवेगळे वापर करून चेह-यावर लेप दिला जातो. पाश्च्यात्य देशात आता हे एक वेगळे तंत्र तयार होऊ लागले आहे.

लहान मुलांना उघड्या अंगाने मातीत खेळू देणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त अशा वेळी कोणी तरी मोठी व्यक्ती शेजारी राहून मुलाला मुंगी वगैरे कांही चावत नाहीना एवढे पहायला हवे.

--- XXX ---

शनिवार, 31 जनवरी 2009

My Great Asset – Vipasana

My Great Asset – Vipasana

My first acquaintance with Vipasana was in 1997 at Igatpuri in presence of Guruji himself. The very first lesson was of humility and self control. Unless you surrender to Guru, no teaching can give you full results. Later he introduced us to the technique of Aanapan to achieve full concentration on breathing. The actual technique of Vipasana came on the 4th day when he taught us how to keep the concentration firmly on breathing and yet be able to consciously feel and watch the sensations arising in each tiniest part of the body. The sensation felt is neither to be enjoyed not to be cursed but the Sadhak has to be neutral and equanimous witness to them. The Sadhak has to understand and appreciate with Pragya that these sensations arising in the body are as ephemeral as a bubble of air arising on the surface of the water.

On finishing the 10 days course, for ever I kept wondering that this was the Vipasana technique, first taught by Buddha who had left all his pleasures, palaces and wealth to find the solution for three eternal sources of grief for mankind namely, illness, old age and death. I am always conscious of the tips of Guruji.

Some years later when my son planned to go abroad for higher studies, I felt desparate to give him some tools and technique to be used in critical moments. I thought of none other than Vipasana and we both once again went through the course. Both of us tremendously feel better to have been equipped with the knowledge of Vipasana.

I could not take up Vipasana as a daily routine but occasionally an inner urge comes and I go into Vipasana Meditation for 1 to 2 hours and I have some strange experiences. Once after suffering continuously for more than 15 days with severe knee pain, I felt an urge for Vipasana. After 2 hours I felt my knee pain had miraculously gone and has not returned since then. On another occasion I was required to wait for a long time at a cold place with no warm clothing. After suffering for an hour or so I found myself concentrating on my breath. Generally, it requires some time of Anapan before you can go into Vipasana phase. On that day almost within a minute I felt concentration and just after 5 minutes of Vipasana my shivering and cold was completely gone. I continued in that place for next 4 hours without any need for warm clothing.

Even though I am not a regular practitioner of Vipasana I feel that by the grace of God an inner voice tells me to perform Vipasana for short occasions and this leads not only to physical relief from pain but also peace of mind and clarity.