रविवार, 8 सितंबर 2013

भाग -- 18 निसर्गोपचार आणि सूर्य

भाग -- 18 निसर्गोपचार आणि सूर्य

    निसर्गोपचारामध्ये सुर्य आणि सुर्य प्रकाश या दोन्ही गोष्टींना अत्यंत महत्व आहे. आपली प्रुथ्वी ही सतत सुर्याभोवती फिरत असते. सुर्याकडून मिऴणारा उजेड व उष्णता यामुऴे प्रुथ्वीवर निसर्गाचे नियमन होत असते. सुर्याचा आरोग्य रक्षणासाठी तसेच रोग बरे होण्यासाठी विशेष पध्दतीने उपयोग करून घेता येतो. पूर्व आणि पश्चीम क्षितीजावर सुर्य असतो त्याचे जे लाल बिंब आपल्याला दिसते त्याचा जास्त चांगला उपयोग आरोग्यासाठी करून घेता येतो. कारण त्यातून आपल्याला मिऴणारे किरण हे कोवऴे असतात म्हणजेच त्यांच्यामध्ये नील व अतीनील किरणांची टक्केवारी कमी झाल्यामुऴे त्यातील बरीच उष्णता अडवली जाऊन आपल्या सहन होईल एवढीच उष्णता त्या किरणांमध्ये राहीलेली असते. अशा सुर्य बिंबामध्ये तीन पध्दतीने व्यायाम करता येतो. पहिला व्यायाम हा सुर्यनमस्काराचा आहे. दुसरा व्यायाम म्हणजे डोऴ्यांचा व्यायाम, यामध्ये सुर्याच्या लाल बिंबाकडे टकलावून पाहणे किंवा डोऴ्यावर हात ठेऊन त्या बोटाच्या फटीतून येईल एवढाच सुर्यप्रकाश डोऴ्यांवर घेणे असे वेगवेगऴे उपाय करता येतात. त्याचप्रमाणे लांब अंतरावरील सुर्याकडे बघणे व द्रुष्टी एखाद्या झाडाच्या डेर्यावर स्थीर करणे व मग पुन्हा सुर्याकडे बघणे व पुन्हा झाडाकडे बघणे असे लांबच्या अंतरावर द्रुष्टी स्थार करण्याचा व्यायाम देखील करता येतो. सुर्यकिरणांचा तिसरा उपयोग म्हणजे सुर्य स्नान. एखाद्या व्यक्तीली सुर्य स्नान ध्यावयाचे असेल तेव्हा एका काऴ्या घोंगडीवर चादर टाकून त्यावर हिरवा पाला अंथरावा. यासाठी केऴीची मोठी पाने किंवा कडूलिंबाची पाने ही सर्वात चांगली. या पानावर त्या व्यक्तीला झोपवून त्याचे सर्व अंग पानांनी झाकून द्यावे व त्या भोवती ओली चादर घट्ट लपेटून द्यावी त्यानंतर वर काऴी घोंगडी टाकून सदर व्यक्तीस त्यावर स्वस्थ पडू द्यावे. हे करीत असतांना त्याच्या कपाऴावर व डोक्यावर ओला टॉवेल गुंडाऴून ठेवावा तसेच त्याला पोटभर पाणी पिऊ द्यावे. तसेच तोंडावर कुठल्याही परीस्थीतीत ऊन पडणार नाही याची काऴजी घ्यावी. मात्र शरीराच्या इतर भागावर सुर्यप्रकाश पूर्णपणे पडू द्यावा. या प्रयोगात वरून काऴी घोगडी किंवा पांढरी चादर न लपेटता फक्त केऴीच्या पानामध्ये त्या व्यक्तीची देह गुंडाऴून चालतो. मात्र अश्या पानांचा थर पुष्कऴ जाड असावा.
      या शिवाय सदर व्यक्तीला सर्व अंगावर गाऴलेल्या ओल्या मातीचा लेप देऊन त्याला एक दोन तास ऊन्हात  बसू देण्याने माती व सुर्यप्रकाश या दोघांचे चांगले परीणाम शरीरावर घडून येतात. सुर्य स्नानाच्या अश्या सर्व पध्दतीमध्ये तोंडावर व डोक्यावर सुर्याचे ऊन लीगू देऊ नये व डोक्यावर ओला टॉवेल कायमपणे ठेवावा.
मातीचा वापर जेंव्हा निसर्गोपचाराच्या इतर कामासाठी केला जातो उदा- पोटावर मातीची पट्टी देणे किंवा तोंडाला मातीचा लेप लावणे इत्यादी, तेव्हा ती माती तयार करण्यासाठी सुर्यप्रकाशाचा उपयोग करतात. नवीन आणलेली माती किंवा एकदा वापरलेली माती पुन्हा 3-4 दिवस कडक सुर्यप्रकाशात तापवल्याने ती माती पुन्हा एकदा निसर्गोपचारात वापरता येऊ शकते.
       आपल्या घरात सुर्यप्रकाश सातत्याने येऊ द्यावा असे आपण ऐकतो. घराची रचना अशी असावी की त्यातील प्रत्येक कानाकोपर्यात व विशेषतः संडास, बाथरूम, स्वयंपाक घर यामध्ये जास्तीत जास्त काऴ सुर्यप्रकाश येत राहील अशीरचना असावी. फक्त ऊन्हाऴ्यामध्ये दुपारी ऊनाची तीव्रता जास्त असते त्या वेऴेपुरता सुर्यप्रकाश घराबाहेर  आडवणे हे चालू शकते. एरवी निदान काचेतून सुर्य प्रकाश
जास्त प्रमाणात घरात यावा अशी घराची रचना असावी.
आपत्याकडे नवीन घरे वा ऑफीसेस बांधत असताना त्यामध्ये निश्चीतपणे एअर कंडीशनर बस,वला जाणार या द्रुष्टीने नियोजन व डिजाईन करण्याची नविन पध्दत चालू झालेली आहे. यामुऴे ऑफीसमध्ये व घरात फॉल्स सिलींग, घराची दारे कायम बंद, खोल्यांमध्ये कायमपणे एअर कंडीशनर व खिडकी असेल तर तीच्या काचेवर फिल्म लाऊन सुर्य प्रकाश कमी करणे इत्यादी प्रकार केले जातात. ही एक अनिष्ठ व आरोग्याला बाधक अशी प्रव्रुत्ती आहे. प्रखर सुर्यप्रकाशाने जेवढ्या मोठ्या प्रमाणात व चांगल्या प्रकारे निर्जंतूकीकरण होते तेवढे अन्य कोणत्याही प्रकाराने होत नाही. दिवसा एअर कंडीशनर व दिव्यांचा वापर करून आपण विजेचा अपव्यय देखील करत असतो. त्याच प्रमाणे सुर्यप्रकाशाला लांब ठेऊन आपण कित्येक वर्म रोग व ह्रदय रोगाला आमंत्रण देत असतो.
वैदीक काऴापासून व आयुर्वेदात सुर्याची महीमा गात असत. सुर्याचे ह्रदयावर नियंत्रण असून तो ह्रदयरोगांना दूर ठेवतो असे म्हटलेले आहे. ज्यांचे ह्रदय नाजूक नसेल त्याने महीन्यातून एकदा वरील प्रकारे सुर्य स्नान आवश्य करावे. तसेच सुर्याच्या कोवऴ्या ऊन्हात सुर्य नमस्कार करीत राहील्याने ह्रदयास विशेष मजबूती प्राप्त होते. सुर्याच्या ऊन्हाचा वापर आपण घरातील कपडे, गाद्या इत्यादींना ऊन देण्यासाठी करतो.आयुर्वेदात सुर्याच्या ऊन्हात तयार केलेला मुरंबा किंवा इतर खारावलेल्या पदार्थांना विशेष महत्व दिले जाते. साठवण खरण्यासाठी धान्यदेखील आपण ऊन्हात वाऴवून ठेवतो.

आधुनीक काऴात सुर्याचा एक वापर आपल्याकडून राहून जात आहे हे नमूद करणे आवश्यक आहे. तो म्हणजे भाज्या व फऴे यांच्या वाढण्यात व पिकण्यात असणारा सुर्यप्रकाशाचा सहभाग. कित्येक भाज्या व विशेषता फऴे यांना एका विशिष्ट प्रखरते खेरीज गोडी येत नाही. ऊन्हाऴ्यांत पिकणार्या सर्व फऴांना हा नियम विशेष करून लागू पडतो. आंबा, द्राक्षे, कलींगड, खरबूज, फणस, बोर इ. फऴांमध्ये जी नैसर्गिक गोडी सुर्याच्या प्रखर ऊन्हामुऴे येते ती इतर उपायांनी येऊ शकत नाही. या सर्व फऴांचा खाद्य पदार्थामध्ये जसा उपयोग आहे तसाच त्यांचा औषधांमध्ये बराच उपयोग होतो. परंतू हा त्यांचा औषधी गुण जर ते त्यांच्या त्यांच्या योग्य मोसमांत वाढवू दिले व पिकू दिले तरच टिकून असतो. आधुनीक क्रुषी तंत्रामुऴे बाजारात सिजनच्या कितीतरी अगोदर फऴे विक्रीकरीता येतात. त्यामुऴे उत्पादक शेतकर्याला फार मोठा मोबदला मिऴतो हे जरी खरे असले तरी अशी फऴे खाल्याने त्यांचा हटकून त्रास होतो. त्याचे कारण एक तर ते फऴ मोसमाच्या आधी तयार होण्यासाठी क्रुत्रीम रसायने व खताचा वापर केलेला असतो. ती रसायने त्यांच्या त्या परीणामासकट फऴात उतरतात. या शिवाय त्या फऴामधील पिकणयाची अंतर्गत प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी व फऴात साखर गोडी निर्माण होण्यासाठी जी प्रक्रीया पूर्ण व्हावी लागते त्यासाठी जी सुर्य काशाची आवश्यकता असली तरी ती गरज इतर कुठल्याही रासायनीक खतातून भरून निघू शकत नाही. ही सुर्य प्रकाशाची गरज पूर्ण न होताच जर ते फऴ क्रुत्रीम उपायांनी पिकवले तर त्यातील गोडी तसेच त्यातील आरोग्यकारक गुण संपून आरोग्यावर त्यांचा निश्चितपणे दुष्परिणाम होतो. याबाबत आपल्या देशांत अद्यापि म्हणावी तशी जागृति झालेली नाही.  पश्चिमेतील देशांत मात्र ही जागृति निश्चितपणे झालेली दिसून येते. त्यांच्या देशांत आपली फळे निर्यात करताना 

भाग 17 संवेदना व स्पर्श चिकित्सा

भाग 17 संवेदना व स्पर्श चिकित्सा

    मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे ऍक्युप्रेशर या पद्धतीचा सिद्धांत असा की, आपल्या शरीरातील विशिष्ट केंद्र बिंदूंवर  विशिष्ट दाब दिल्याने त्या ठिकाणी अडकून पडलेल्या शक्तीचा प्रवाह व्यवस्थीतपणे सुरू होतो. अशा तर्हेने पूर्ण शरीरभर शक्तीचा प्रवाह नीट चालू होऊन त्यामुऴे शरीरातील इतर ठिकाणी उत्पन्न झालेल्या व्याधी आटोक्यात येतात. मसाज थेरपी व ऍक्युप्रेशर या दोन क्रियांमध्ये फरक असा की ज्या भागांत शरीराला दुखापत झाली किंवा जडपण जाणवत असेल त्या ठिकाणी मसाज केल्याने तेथे हलकेपणा व स्फूर्ती निर्माण होतात. आणि अशा हलकेपणा व स्फूर्तीमुऴे एका प्रकारे संपूर्ण शरीरातील आरोग्य टिकून राहते. मात्र ऍक्युप्रेशरचे वैशिष्ठ्य असे की एका केंद्रावर दाब देवून दुसऱ्या केंद्रावर प्रभाव निर्माण होतो व तेथील कार्यक्षमता वाढते.
         योगासनामध्ये देखील थोडा फार ऍक्युप्रेशरचाच  सिध्दांत वापरलेला आहे. सर्व योगासने व कित्येक योगीक क्रिया या शरीरातील विशिष्ठ्य केंद्रांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी असतात. योगासनाच्या सिध्दांता प्रमाणे शरीरात सात अतीमहत्वाची केंद्रे आहेत जिथून मेंदूकडे संवेदनांची वाहतूक करणार्या नाड्यांचा प्रवाह सुरू होतो. अशा प्रकारे शरीरात मुलाधार स्वाधिष्ठान, मणीपूर, अनाहत, विशुध्द व आज्ञा अशा सहा चक्रांची कल्पना केलेली असून  या प्रत्येक केंद्रावर मोठ्या प्रमाणात संवेदना वाहक नाड्यांचे जाऴे असून त्यांचे नियमन होत असते. या प्रत्येक चक्रात एक-एक शक्तीचे उगम स्थान असून त्या सर्व शक्तींचे परमस्थान हे मेंदूत असलेल्या एका सातव्या चक्रात ज्याला सहस्रार चक्र म्हणतात, तिथे अशी कल्पना केलेली आहे. योगासने करण्याने शरीराच्या ज्या त्या अवयवांना योग्य तो ताण मिऴत असतो व एक प्रकाराने मसाज किंवा मर्दनची क्रियाच पार पाडली जात असते. तरीही योगसनांचा दुसरा परीणाम असा होतो की विशिष्ठ आसनांमुऴे शरीरातील विशिष्ठ चक्र किंवा शक्ती केंद्र जास्त कार्यक्षम होते.

योगासनांमध्ये मुद्रा हा एक विशिष्ठ प्रकार सांगीतलेला आहे. उदा- सिंहमुद्रा, शांभवी मुद्रा इत्यादी. त्याच त्याच जोडीला काही विशिष्ठ हस्तमुद्रा देखील सांगीतल्या आहेत. उदा- ज्ञान मुद्रा, शंख मुद्रा इत्यादी. हस्त मुद्रामुऴे तऴ हातावरील विशेष केंद्र बिंदूवर विशेष दाब पडतो व ऍक्युप्रेशरच्याच सिध्दांता प्रमाणे त्याचाही परीणाम शरीरातील इतर अवयवामध्ये व्याधी दूर होऊन आरोग्य निर्माण होणे असाच असतो, असे वर्णन केले आहे. याचाही जास्त अभ्यास व पडताऴा या क्षेत्रातील जिज्ञासू व्यक्तींना घेण्याची आवश्यकता आहे. ऍक्युप्रेशरच्या सिध्दांतात  तसेच वर नमूद केलेल्या कित्येक हस्तमुद्रांमध्ये दाब निर्माण करणे ही महत्वाची प्रक्रीया आहे. परंतू काही हस्तमुद्रा या दाबाने परीणामकारक ठरत नसून अनुभूतिने परिणाम करतात असा या क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. उदा- ज्ञान मुद्रा. यामध्ये तऴ हात संपूर्ण उघडा करून अंगठा व तर्जनी या बोटांच्या वरच्या पेरातील उंचवट्यांचा एकमेकांना स्पर्ष करावा व इतर तिन्ही बोटे एकमेकांना चिटकवून सरऴ उघडी ठेवावीत असे सांगीतले आहे. आशीर्वाद देण्यासाठी या मुद्रेचा वापर करतात. याबाबत असे वर्णन वाचले आहे की अंगठा व तर्जन यांचा एकमेकांना होणारा स्पर्ष इतका अलगद असावा की त्यामधून एक अत्यंत आनंददायी अनुभूती निर्माण व्हावी व संपूर्ण लक्ष त्या स्पर्षाचा अलगदपणा टिकवण्या मध्येच केंद्रीत असावे जेणेकरून  त्या अनूभूतीचा प्रत्यय घेता य़ेईल. अशी अवस्था सिध्द झाल्यास तर्जनीच्या टोकाला नाडीचे स्पंदन स्पष्टपणे ऐकू येते. याचे कारण असे की शरीरातील सूक्ष्मात सूक्ष्म अशा प्रवाहांबाबत आपण संवेदनक्षम झालेलो असतो. व ते प्रवाह आपल्याला ओऴखता येतात. या सर्व सिध्दांताबाबत मला वेगऴा अनुभव मिऴाला. गोव्यामध्ये निसर्गोपचार करणारे एक तज्ञ मला भेटले, त्यांनी त्यांच्याकडील रोग्यांसाठी ते ऍक्युप्रेशरसारखीच परंतू थोडी वेगऴी पध्दत वापरतात असे सांगितले. ऍक्युप्रेशरमध्ये सांगीतलेल्या केंद्रांचाच ते देखील वापर करतात परंतू जास्तीत जास्त दबाव देण्याचे तंत्र न वापरता त्या त्या केंद्रावर अत्यंत हलकेपणाने फक्त स्पर्श करणे अशी पध्दत ती वापरतात. कित्येकदा हा स्पर्श फक्त त्या केंद्राच्या पुरताच मर्यादीत न ठेवता त्या केंद्राच्या आजूवाजूच्या थोड्याश्या भागांमध्ये देखील हलके पणाने स्पर्श करतात यामुऴे ते केंद्र व त्याच्या जवऴपासचे क्षेत्र अतीसंवेदनक्षम होते. थंडीत कित्येकदा हाताच्या व पायाच्या बोटांमध्ये विशेषतः सांध्याच्या ठिकाणी दुखण्याचा त्रास कित्येकांना होत असतो अशा वेऴी आपल्या डाव्या हाताच्या बोटानी उजव्या हाताच्या बोटाना अत्यंत अलगदपणे कुरवाऴले तर त्याचाही उपयोग होतो. या शीवाय जखम होऊन सुज आली असेल तर तो ठणका जाण्यासाठी देखील याच पध्दतीचा वापर करता येतो. असे कित्येक अनोखे प्रयोग त्यांनी मला ऐकवले. याचा उपयोग मी स्वतः 3-4 वेऴा खांदे  दुखी, बोटामधील सांधे दुखी व माथ्यावरील कवटीमध्ये थोडेफार दुखत असताना करून बघीतला व त्याचा फायदा मिऴाला.
       यावरून मला असे वाटते की शरीरातील विभीन्न भाग संवेदनक्षम झाल्याने त्या ठीकाणच्या रोगावर काहीतरी चांगला परीणाम होत असावा. असे वाटण्याचे दुसरे कारण असे की ध्यान या प्रकारात शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रीत करून त्या त्या अवयवातील अनुभूती जाणून घेण्याचा प्रयत्न करणे या क्रीयेला फार महत्व सांगीतलेले शवासन किंवा जैनांच्या प्रणालीत सांगीतलेली कार्योत्सर्ग ही प्रक्रीया  किंवा बुध्दांच्या प्रणालीत सागीतलेली विपश्यना ही क्रीया या तीघांमधील पहीली पायरी म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयवावर ध्यान केंद्रीत करून तेथील अनुभूती समजून घेणे. पुढील जी ज्ञानप्राप्ती करावयाची आहे व त्यासाठी मनावर बुध्दीवर किंवा प्रज्ञेवर जे ध्यान केंद्रीत करावयाचे आहे तो टप्पा गाठण्यापुर्वी शारीरीक टप्पा गाठणे हे आवश्यक मानले जाते. यावरून असे वाटते की शरीर नीरोगी असेल, व प्रत्येक अवयवातील शक्तीचा किंवा चैतन्याचा प्रवाह अनिर्बध रहात असेल, त्यामध्ये हलकेपणा असेल तेव्हाच खर्या अर्थीने व संपूर्णपणाने ज्ञान प्राप्ती अगर साक्षात्कार होऊ शकतो. शरीराची निरोगीता स्पर्शाद्वारे वाढवणे, मग तो स्पर्श दाब देऊन असेल अगर हलकेपणाचा असेल, हे एक समान सूत्र वरील सिध्दांतामध्ये दिसून यते.

भाग 16 ऍक्यूप्रेशर

भाग 16 ऍक्यूप्रेशर

ऍक्युप्रेशरचा समावेश निसर्गोपचारांत कारावा की नाही याबाबत थोडेसे वाद आहेत. मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे एकोणवीसाव्या शतकांत जेव्हा ऍलोपथी देखील प्राथमीक अवस्थेत होती आणि जर्मनीमध्ये पर्यायी उपाय शोधण्याकडे लोकांचा जास्त कल होता, त्यातून प्ररणा घेऊन औषध विरहीत अशा निसर्गोपचार तत्वाचा उदय झाला. त्यामध्ये सुरूवातीला आहार नियमन, योग्य व्यायाम, पाणी, भाजी, सुर्य, खुली हवा यांचा आरोग्यासाठी वापर इत्यादी बाबी पुढे आल्या. त्याच सुमारास भौतीक शास्त्र देखील प्रगत होत होते. त्यामध्ये चुंबक, वीज इत्यादी विषयांवर बरेच प्रयोग होत होते.  भौतीक शास्त्राच्या प्रयोगांच्या काटेकोर मोजणीसाठी बनवलेला थर्मामीटर तितक्याच सहजतेने रोग्याचे तापमान मोजन्यासाठी पण वापरला जाऊ शकतो, याचा उपयोग डॉक्टरांनी लगेच केला. त्याचप्रमाणे मॅग्नेटची थिरपी, इलेक्ट्रोथीरपी, एवढेच नाही तरी रंगाची थिरपी असे प्रयोग देखील होऊ लागले. विशेष म्हणजे या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिऴाले.
जर्मनीमधून निसर्गोपचाराचे शास्त्र पसरले आणि अमेरीकेत पोहोचेल. त्याचबरोबर हऴू हऴू औषध विरहीत थिरपी ही संकल्पना लोकांना आवडू लागली होती त्यामुऴे कित्येक वेगऴे प्रकार पुढे येऊ लागले. मसाज थीरपी हा त्यातला एक. मानसशास्त्राने रोगी बरे करणे हा दुसरा आणि आता तर अगदी फेथ हीलींगने देखील रोगी बरे केले जातात असं ऐकायला मिऴतं. म्हणून 1802 मध्ये अमेरीकेत सर्व निसर्गोपचारकांचा एक मोठा मेऴावा आयोजीत करण्यांत आला असताना निसर्गोपचाराची सर्व समावेशक व्याख्या करून जिथे जिथे आधुनीक मेडीकल शास्त्राला मान्य असलेल्या गोऴ्या इंजेक्शन न देता रोग्यावर उपचार केले जातात ते सर्व निसर्गोपचार अशी एक व्याख्या सम्मत झाली. या उलट काही कट्टर निसर्गोपचारकांना फक्त आहार नियमनातून उपचार एवढाच अर्थ मान्य असून इतर सर्व प्रकारच्या चिकीत्सेला मग ती पाण्याची असेल, मसाजची असेल अगर फेथ हीलींग असेल त्या सर्वांना विरोध आहे.
      कालांतराने जसे अमेरीकेत आशीयायी देशांबद्दल विशेष माहीती मिऴून तिकडील तत्वज्ञान आणि पद्धतींची चर्चा होऊ लागली तशी चीन, जापान, तिबेट इत्यादी देशांत प्रसिद्ध असलेले ऍक्युपॅक्चर व ऍक्युप्रेशर हे दोन प्रकारही रोगावरचे उपाय म्हणून स्वीकारले जाऊन निसर्गोपचाराच्या सर्वसमावेशक व्याख्येमध्ये या दोन पद्धती शामील करण्यांत आल्या. त्यापैकी ऍक्युप्रेशर ही पद्धत वापरायला जास्त सोपी असल्याने तिचा प्रचार जास्त जोराने झाला. या पद्धतीची विचारसरणी अशी आहे की आपल्या शरीरात जागोजागी महत्वाची ठीकाणे किंवा केंद्र आहेत. शरीरभर वेगवेगऴी जाऴी विणलेली आहेत. रक्त नलीकांचे एक जाऴे तर नसांचे दुसरे जाऴे यातील जी काही दोन किंवा जास्त नाड्यांची जंक्शन्स असतात त्यांना विशेष महत्व असते. आपल्या शरीरातले चैतन्य या मसांमधून खेऴत असते. मात्र एखाद्या जंक्शन मध्ये किंवा एरवी देखील  या शक्तीप्रवाहाला काही अडथऴे निर्माण होतात. अशावेऴी शरीरांत कुठेतरी रोग उद्भवतो. शक्तीप्रवाहातील अडथऴा दूर केला की रोगही बरा होतो.
       असे अडथऴे दूर करण्यासाठी शरीरातील महत्वाच्या केंद्रांना सतत साफ ठेवावे लागते. यासाठी तीथे सुया टोचून ठेवणे म्हणजे ऍक्युपंक्चर याऐवजी  त्या त्या केंद्रावर दाब देणे म्हणजे ऍक्युप्रेशर. ऍक्युप्रेशर मधे तऴहात आजी तऴपाय यांना विशेष महत्व आहे कारण या दोन्ही ठीकाणांवर आपल्याला उंचवटे दिसतात. हे उंचवटे शरीराच्या विभीन्न अवयवांचे प्रतिबींब मानले जातात आणि वेगवेगऴे उंचवटे दाबून शरीरातील वेगवेगऴे रोग दूर होतात असेही मानले जाते. मसाज थीरपी आणि  ऍक्युप्रेशर मधील महत्वाचा फरक असा की मसाज थीरपी मध्ये ज्या अवयवाचा रोग असेल त्यावरच मसाज केला जातो. ऍक्युप्रेशर मधे रोगाची जागा वेगऴी पण दबावाचे केंद्र वेगऴे असा प्रकार असतो. ऍक्युप्रेशर वापरून दीर्घ मुदतीचे व पूर्ण शरीर व्यवस्था बिघडवणारे आजार उदा. सांधीवात किंवा डायबीटीज देखील बरा केल्याची उदाहरणे आहेत परंतू डायबीटीज आणि मसाज थीरपी वापरली जात नाही हा एक मुद्दा आहे शरीराची चांगली मसाज केल्याने शांत झोप लागते तसेच तऴपाय किंवा डोकं चेपून पण चांगली झोप लागते आणि पूर्ण गाढ झोप मिऴाल्याने शरीराचे रोग दूर होण्यासाठी नक्की मदत होते. भारतात ऍक्युप्रेशरची काय स्थीती आहे…. कायद्याच्या भाषेत बोलायचे तर सरकारने निसर्गोपचार ही एक  आजार बरी करणारी आरोग्य राखणारी पद्दत आहे हे तत्वता मान्य केले आहे. ते करताना निसर्गोपचार या शब्दाच्या व्याख्येत ऍक्युप्रेशरचा समावेश पण केलेला आहे. मात्र ऍक्युप्रेशर तज्ञ कोणाला म्हणायचे त्याला सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन कोणत्या पद्दतीने द्यायचे याबाबतचे नियम अजून ठरलेले नाहीत.
        कायद्यातली अडचणीची दुसरी बाजू अशीही आहे की एखाद्याने मी तुला ऍक्युप्रेशरने बरे करतो असे म्हटले व प्रत्यक्ष बरा करू शकला नाही तर त्याच्यावर खटला कोणत्या कायद्याखाली व कोणत्या गुन्ह्यासाठी भरणार.... कारण त्याने जे काही केले होते ते मेडीकल शास्त्राच्या व्याख्येत मेडीसीन म्हणून बसत नाही. मात्र ऍक्युप्रेशरची प्रॅक्टीस करणारे भारतात व पाश्चात्य देशांतही आहेत. त्यांची संख्या फार कमी आहे.(भारतात अंदाजे दोनशे) त्यांच्याकडे जाणारे रूग्ण अत्यंत कमी असतात. कित्येकांना चांगला अनुभव येतो. मात्र याचे वैज्ञानीक पद्दतीने रेकॉर्ड सहसा कोणी ठेवत नाही. रोगी जर ऍक्युप्रेशरने बरा झाला असेल तर त्याचा मुऴ रोग कोणता होता, किती जुना, त्रास नेमका काय व कीती प्रमाणात होता आणि बरा होताना तो कसा कसा बरा झाला, किती वेऴ लागला, बरा झाल्याचे कसे ठरवले इत्यादी बाबत संख्यात्मक माहीती नसेल तर त्या चीकीत्सेचे महत्व कमी होऊन बसते.

         मात्र सर्व एशीयायी देशांमध्ये ही पद्धत फार पूर्व काऴापासून वापरली जात असल्याने या विषयावर खूप पुस्तके वाचायला मिऴू शकतात. या पद्धतीचा व योगातील काही पद्धतींचा पण काय संबंध आहे ते पुढील लेखात पाहू......... 
--------------------------------------------------------- 
  A good bit of info from Raghvendrachar ji. Me too have this text vijnana bhairava tantra (vbt) with me. Osho spoke a lot about this text in his discourses and texts.
Love and regards,
Sreenadh
(WHO IS SREENATH ?)

--- On Fri, 3/12/10, raghavendra char <sujokachar@gmail.com> wrote:

From: raghavendra char <
sujokachar@gmail.com>
Subject: Fwd: acupuncture is vb tantra - sloka 93
To: sreesog@yahoo.com
Date: Friday, March 12, 2010, 12:18 PM

there is an ancient sanskrit text called vijnana bhairava tantra (vbt).  this is known as a yogic book.  but many people are not aware that this is also an acupuncture book.  acupuncture is a therapy based on panchamahabhutha (pmb) - five-element - principles.   this india-born chikitse exported to china in ancient times.  india has lot this knowledge completely, whereas china has preserved this, improved upon it and most importantly, practicing acupuncture even today.  hence, it is called as chinese medicine.
 
pmb is a vedic cosmology.  therefore, all the vedic and upanishad texts tells the story of pmb in different manners.  acupuncture tells that pmps are spread all over the human body in the name of aksharas, mantras, marmas, vital centres of prana, etc.  vbt tells the same thing and it offers methods to release the prana blocked in the different body parts.  let us see what sloke 93 of vbt says:
 
kinchidangam vibhidyaadau teekshnasoochyaadinaa tatah;
tatraiva chetanaam yuktvaa bhairave nirmalaa gatih.
 
the meaning of the above sloka is that insert a sharp needle on the body parts, so that blocked prana starts flowing freely to the whole body.  since acupuncture tells the same, this is an acupuncture sloke.
 
many slokas in vbt are acupuncture slokas;  although it is a yogic book.  acupuncture and yoga are two faces of a coin.  acupuncture tells that this human body is nothing but the playground for prana to unfurl cosmic manifestation.  
 
raghavendrachar
yoga shikshak & sujok acupuncturist
bangalore - india.
    
health capsule:  the times of india, bangalore - 20th may 2010 - page 15:
is there an alternative to antibiotics for urinary tract infections?
try acupuncture.  94 women with utis were studied by researchers in norway.  those who received acupuncture twice a week for a month had a uti recurrence rate 50% lower than those who weren't treated.











जिभेवरील अनियंत्रणाचा फटका --भाग 15

जिभेवरील अनियंत्रणाचा फटका -- भाग 15

जिभेबद्दल खूप व्यक्तींनी इतरांचे खूप प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हीच्यावर नियंत्रण ठेवणे कीती महत्वाचे आहे हे सांगीतले आहे. जिभेवर दोन प्रकारे नियंत्रण ठेवावे लोगते. एक बोलण्याच्या संदर्भात आणि दुसरे खाण्याच्या संदर्भात या दोन्ही क्रियांचा पण अन्योन्य संबंध आहे. एका प्रकारचे नियंत्रण जमते. दुसर्याही प्रकारचे जमू शकते. आपण पुष्कऴदा आग्रह झाल्यामुऴे, एखादा आवडीचा पदार्थ समोर आल्यामुऴे किंवा पानात घेतलं आहे ते संपवाव यामुऴे तर कधी  गप्पांच्या नादात जास्त जेवण करतो. त्याचा जर आपल्याला त्रास झाला तर तो आपल्याच अधाशीपणामुऴे झाला हे कबूल करण्याची आपली मनाची तयारी नसते. म्हणूनच याबाबतचा माझा अनूभव मुद्दाम सर्वांसमोर ठेवत आहे.
     चाऴीशीनंतर निसमीत व्यायाम न केल्यास आपली अन्नपचनाची शक्ती कमी होऊ लागते. अशा वेऴी हा अनुभव आला की दाणे कोणत्याही स्वरूपात खाल्ले तरी ते प्रमाणाबाहेर खाल्ले गेले तर त्याचा त्रास होतोच व पित्त बाहेर पडून गेल्याशिवाय हा त्रास थांबत नाही. पोटात हमखास वाताचा प्रकोप म्हणजे गॅस धरणे हा प्रकार होतो. या वाताला आयुर्वेदाला अपानवायु असे नाव आहे व तो अधोगामि म्हणजे खालच्या दिशेने निघून जाणारा असतो. परंतू वाताचा प्रकोप झाल्यास तो कफ व पित्त या दोघांवरही विपरीत परीणाम करू शकतो. अपानवायुचा प्रकोप झाल्यास तो उर्ध्वगामी होतो. अशावेऴी करपट ढेकर मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरूवात होते. त्या पुढची पायरी म्हणजे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. यापुढची पायरी म्हणजे श्वासोच्छवासाचा त्रास त्यानंतर ह्रदयाच्या मांसपेशींमधे दुखणे व सरते शेवटी पाठीच्या मणक्याचा त्रास इथपर्यंत एका उर्ध्वगामी अपानवायुमुऴे दुश्परीणाम होतात.

      मला अधून मधून शेंगदाणे खाण्याची तीव्र इच्छा होते. शेंगदाणे पाण्यात भिजवणे, भाजणे, मिठासोबत खाणे व गुऴासोबत खाणे याचे फायदे वेगवेगऴे असतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे मात्र मला असाच एक दिवस जास्त दाणे खाल्याचा जबरदस्त त्रास झाला. मोठ्या प्रमाणावर खाल्लेले दाणे पचायला वेऴ लागत असल्याने सुमारे दहा तास पोटदुखीने हैराण केले. तीन ते चार वेऴा उलटी होऊन बरेचसे अन्न बाहेर पडून गेल्यावर मग कुठे बरे वाटले. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा चार पाच वेऴ घडला. निमीत्ताला कधी शेंगदाणे, कधी पुलाव , कधी तिखट चटपटीत इडली सांबर असे होते.प्रत्येक वेऴी घरची मंडऴी किंवा तात्काऴ उपलब्ध झालेले डॉक्टर उपाय सुचवतांना आधी काय खाल्ले यापेक्षा किती खाल्ले ते या समस्येचे मूऴ आहे. अशा वेऴी फार घाईने उलट्या काढणे त्रासाचे ठरले कारण चक्कर येऊ लागली. सोडा इत्यादी घेणे त्रासाचे ठरले कारण ज्यादा गॅस निर्माण झाल्याने पोटाला जास्त तडस लागून पोटाच्या जोडीला छाती व पाठही दुखू लागते. जे कमी त्रासाचं ठरलं ते थंडगार पाणी घोट दोन घोट पीत रहावे. उलटी येत असेल तेव्हा तोंडात जी लाऴ किंवा थुंकी निर्माण होते ती पटापट गिऴत राहील्यास उलटी थांबण्याची प्रव्रुत्ती निर्माण होते. या उलट ती लाऴ पटापट थूंकून टाकत राहील्यास पटकन उलटी होऊन जाते. याही तत्वाचा वापर करून उलटी होऊ दिली तेव्हा ते कमी त्रासाचे ठरले. पोटावर थंड पाण्याची पट्टी किंवा तेलाने मालीश हाही उपाय तडस होणारे दुःख कमी करण्यास उपयोगी पडतो. गेल्या वर्षभरांत निरनिराऴे पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले गेल्याने जो त्रास झाला त्यावरून हा कोणत्या एका पदार्थाचा दोष किंवा ऍलर्जी नाही हे कऴले. शेंगदाणे, तूरडाऴ हे पित्तकर असले तरी पुलाव, दही-वडे हे पदार्थ पित्तकर नव्हते. आता या जास्त खाण्याच्या त्रासाच्या बाबत अनुभवाने मी बरीच तज्ज्ञता मिऴवली आहे व जिभेवर निय़ंत्रण हाच त्याचा उपाय हे मला पक्के समजले आहे.
---------------------------------------------------------