बुधवार, 11 जुलाई 2018

पाऱ्याचे रसायन शास्त्र

'आपले प्राचीन ‘संपन्न’ रसायन शास्त्र'

पाऱ्याचा शोध नेमका कोणी लावला..? 

ह्या प्रश्नावर निश्चित असे उत्तर कोणीच देत नाही. पाश्चात्य जगाला तर अगदी सतराव्या शतकापर्यंत पाऱ्याची नीट ओळख नव्हती. इजिप्त मधल्या पिरामिड मधे इसवी सनाच्या १८०० वर्षां पूर्वी चा पारा ठेवलेला आढळला. 

पारा विषारी असतो या बाबत सर्वांचेच एकमत आहे. म्हणूनच १४० पेक्षा जास्त देशांनी पाऱ्याचा समावेश असलेल्या भारतीय आयुर्वेदिक औषधींवर तीन वर्षांपूर्वी प्रतिबंध लावला होताजो नंतर उठवल्या गेला.

मात्र गंमत म्हणजे हा विषारी समजला जाणारा पाराइसवी सनाच्या दोन / अडीच हजार वर्षांच्या आधीवेगवेगळ्या क्षेत्रात भारता द्वारे वापरला जात होता. इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी पासून तर हा आयुर्वेदात वापरला जातोय. अगदी पोटात घेण्याच्या औषधांमधे..! आतापाश्चात्य जग ज्या बद्दल तीनशे वर्षांपूर्वी पर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होतंअश्या विषारी पाऱ्याचा उपयोग साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी पासून आपण औषध म्हणून करतोयहेच मुळात आश्चर्य आहे. आणि अश्या प्रकारे पाऱ्याचा उपयोग करताना त्याची पूर्ण ‘प्रोसेसिंग’ करून तो वापरला जायचा हे महत्वाचं.

आपल्या संस्कृतीत ज्या प्रमाणे जन्मापासून मृत्यू पर्यंत मनुष्यावर सोळा संस्कार केले जातातत्याप्रमाणे पाऱ्यावर अठरा प्रकारचे संस्कार करून मगच तो औषधाद्वारे सेवन करण्या योग्य होतो. हे १८ संस्कार आहेत –
१. स्वेदन २. मर्दन ३. मूर्च्छन ४. उत्थापन 
५. पातन ६. रोधन  ७. नियामन ८. संदीपन 
९. गगनभक्षणमान  १०. संचारण ११. गर्भदृती  १२. बाह्यदृती 
१३. जारण  १४. ग्रास  १५. सारण  १६. संक्रामण
१७. वेध  १८. शरीरयोग 

वाग्भटाचार्यांनी लिहिलेल्या ‘रस रत्नसमुच्चय’ यां ग्रंथात पाऱ्याच्या औषधी उपयोगाबद्दल बरीच सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ साधारणपणे इसवी सन १३०० च्या आसपास लिहिल्या गेलेला आहे. यातील माहिती ही संकलित आहे. अर्थात जे ज्ञान आधीपासूनच माहीत आहेत्याला हे तेराव्या / चौदाव्या शतकातले वाग्भटाचार्य शब्दांकित करूनसविस्तर समजाऊन आपल्यापुढे ठेवताहेत. (हे वाग्भट वेगळे आणि ‘अष्टांग हृदय’ हा आयुर्वेदाचा परिपूर्ण ग्रंथपाचव्या शतकात लिहिणारे वाग्भट वेगळे).

या ग्रंथात वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विधी सविस्तर दिलेल्या आहेत. अर्थात किमान दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून आपल्या भारतीयांना हे ‘रसायन शास्त्र’ फार चांगल्याने माहीत होतं आणि आपल्या पूर्वजांनी त्याचा अत्यंत पद्धतशीर पणे विकास केलेला होता. 

रस रत्नसमुच्चयात’ दिलेल्या माहितीनुसार दोला यंत्रपातना यंत्रस्वेदनी यंत्रअंधःपातन यंत्रकच्छप यंत्रजारणा यंत्रविद्याधर (ऊर्ध्वपातन) यंत्र,सोमानल यंत्रबालुका यंत्रलवण यंत्रहंसपाक यंत्रभूधर यंत्रकोष्टी यंत्र,वलभी यंत्रतिर्यकपातन यंत्रपालिका यंत्रनाभी यंत्रइष्टीका यंत्र,धूप यंत्रस्वेदन (कंदुक) यंत्रतत्पखल यंत्र.. अश्या अनेक यंत्रांचा उपयोग ‘रसशाळेत’ केला जायचा. या यंत्रांद्वारे पारद (पारा)गंधक इत्यादींवर रासायनिक प्रक्रिया करून औषधं तयार केली जायची.

नागार्जुनाने ‘रस रत्नाकर’ या ग्रंथात सिनाबार या खनिजापासून पारद (पारा) मिळविण्याच्या आसवन विधीचा विस्ताराने उल्लेख केला आहे. अशीच विधी ‘रस रत्नसमुच्चय’ आणि पुढे चरक / सुश्रुत यांच्या संहितेतही आढळते. यात आसवन प्रक्रियेसाठी ढेकी यंत्राचा उपयोग सांगितलेला आहे. गंमत म्हणजे ज्या आधुनिक पद्धतीने पारा प्राप्त केला जातोती विधीह्या ग्रंथात दिलेल्या विधीसारखीचफक्त आधुनिक साधनांनी केलेलीआहे...!

हे फार महत्वाचं आहे. ख्रिस्तपूर्व पाचशे / सहाशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी अत्यंत व्यवस्थित, well defined, systematic अश्या अनेक रासायनिक प्रक्रिया वापरायला सुरुवात केली होतीज्यांचं मानकीकरण (standardization) त्याच काळात झालेलं होतं. 

आचार्य सर प्रफुलचंद्र रे (सन १८६१ ते १९४४) यांना आधुनिक काळातील आद्य रसायन शास्त्रज्ञ म्हटले जाते. यांनीच भारताची पहिली औषधं निर्माण करणारी कंपनी, ‘बंगाल केमिकल्स एंड फार्मेस्युटीकल्स’ स्थापन केली. इंग्रजांच्या वरिष्ठ वर्तुळातही यांना बराच सन्मान होता. ह्या प्रफुलचंद्र रे ह्यांनी एक सुरेख पुस्तक लिहिलंय – ‘हिंदू केमिस्ट्री’ नावाचं. या पुस्तकात त्यांनी ठामपणे हे मांडलंय की रसायनशास्त्राच्या निर्मितीत आपले हिंदू पूर्वज कितीतरी पुढे होते. या पुस्तकात त्यांनी वेदांमधे असलेला वेगवेगळ्या रसायनांचा उल्लेखअणु / परमाणूंचं असलेलं विस्तृत विवेचनचरक आणि सुश्रुत यांनी रसायनांवर केलेले विस्तृत प्रयोग या बद्दल विस्तारानं लिहिलं आहे. अगदी त्या काळात असलेल्या केस रंगवण्याच्या कलेपासून ते पाऱ्यावर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांपर्यंतचे अनेक संदर्भ या पुस्तकात येतात. धातुशास्त्राबद्द्ल सुध्दा या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे. १९०४ मधे लिहिलेल्या ह्या पुस्तकाने इंग्रज संशोधकांचा आयुर्वेद आणि आपल्या प्राचीन रसायन शास्त्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. 
आपल्या वेदांमध्ये रसायन शास्त्रासंबंधी अनेक उल्लेख येतात. आयुर्वेदात अश्मनमृत्तिका (माती)सिकता (वाळू)अयस (लोखंड किंवा कांसे)श्याम (तांबे)सीस (शिसे) यांच्या मदतीने केलेल्या प्रयोगांची उदाहरणं आहेत.

तैत्तिरीय संहितेचा भाष्यकार, ‘सायण’ याने श्याम चा अर्थ काळे लोखंड असा केला आहे. यजुर्वेदात एका मंत्रात अयस्ताप (Iron Smelter) चा उल्लेख आहे. लोखंडाच्या खनिजाला लाकूड / कोळश्याने तापवून कश्या प्रकारे लोखंड हा धातू तयार केला जातो याचे वर्णन यात केलेले आहे. अथर्ववेदात शिसे या धातूवर ‘दघत्यम सीसम..’ नावाचे पूर्ण सुक्त आहे. शिश्याचे बनवलेले छर्रे युद्धात वापरायचे असा अर्थ यातून ध्वनित होतो. 

प्राचीन काळातील यज्ञशाळा ह्याच या देशातील मूळ रसायनशाळा होत्या. तैत्तिरीय संहितेत यज्ञशाळेत / रसायनशाळेत लागणाऱ्या उपकरणांची सूचीच दिलेली आहे –
इष्य - इंधन 
बर्ही -  फुंकणी किंवा स्ट्रॉ 
वेदि / घिष्ण्य - अग्नी निर्माण करण्याच्या जागाज्यातून रासायनिक प्रक्रियांसाठी  लागणाऱ्या भट्ट्या निर्माण झाल्या.
स्रुक - चमचे 
चमस -   प्याले / भांडी 
ग्रावस -  खल-बत्ता मधील बत्ता 
द्रोणकलश -  रसायने ठेवण्याचे लाकडी पात्र 
आघवनीय - रसायनांचे मिश्रण करण्याचे पात्र 

ही यादी बरीच लांबलचक आहे. पण याचा अर्थ स्पष्ट आहे. त्या वैदिक काळातशास्त्रशुध्द रित्या तयार केलेल्या रसायनशाळा होत्या. तेथे कोणकोणत्या वस्तू / पात्र असाव्यात हे निश्चित होतं. आणि करण्यात येणाऱ्या प्रक्रिया सुध्दा निश्चित आणि ठरलेल्या होत्या.

शतपथ ब्राम्हणऋग्वेदयजुर्वेदअथर्ववेद इत्यादी ग्रंथात ठिकठिकाणी रसायनं आणि त्यांचे विविध क्षेत्रात होणारे उपयोग या संबंधी विवेचन आढळते.

या काळात जगाच्या इतर भागातरसायनशास्त्रा संबंधी असे सुस्पष्ट,व्यवस्थित आणि प्रक्रीयेसहित केलेले विवेचन आढळते का..उत्तर नकारार्थी आहे. इजिप्त मधे काही मोजके उल्लेख आढळतात आणि चीन मधे. चीन ने अनेक रसायनांवर त्या काळात काम केल्याचे दिसते. मात्र हे सोडलं तर जगात इतरत्र कोठेही रसायनशास्त्र इतक्या प्रगत अवस्थेत आढळत नाही. 

अकराव्या शतकातील चक्रपाणी दत्त ने ‘चक्रदत्त’ नावाचा ग्रंथ लिहिलाय. जुन्या माहितीला शब्दबध्द करून तो सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवतो. यात त्याने ताम्ररसायन बनविण्याची विधी दिलेली आहे. पारातांबे आणि अभ्रकावर प्रक्रिया करून त्याला गंधकाचा पुट देऊन ताम्ररसायन कसे तयार करतातहे त्याने समजाऊन सांगितले आहे. याच पद्धतीने ‘शिलाजतुरसायन’ चे विवरण आहे. 

चक्रपाणी च्या दोनशे वर्षानंतर शारंगधराचार्य यांनी लिहिलेल्या ‘शारंगधर संहिते’ मधे अनेक रसायन प्रक्रियांबद्दल उल्लेख आहे. मात्र यात सुरुवातीलाच लिहिले आहे की जुन्या ऋषी-मुनींनी आपापल्या संहितांमध्ये जे श्लोक दिलेले आहेतआणि अनेक चिकित्सकांनी ज्यापासून यश मिळवले आहेअश्या श्लोकांचे हे संकलन आहे. या संहितेत आसवकाढे बनवताना रासायनिक प्रक्रिया अत्यंत विस्तृतपणे दिलेल्या आहेत. 

या किंवा अश्या अनेक ग्रंथांमध्ये कणाद च्या अणु / परमाणु सिद्धांताचा उल्लेख केलेला आढळतो. कणाद ने सांगितले आहे की एका प्रकारचे दोन परमाणु संयुक्त होऊन ‘द्विणूक’ निर्माण होऊ शकते. द्विणूक म्हणजेच आजच्या शास्त्रज्ञांनी परिभाषित केलेला ‘बायनरी मॉलीक्युल’ वाटतो.

प्राचीन भारतात रासायनिक प्रक्रियांसंबंधी बरीच माहिती होती. याच लेखमालेत ‘अदृश्य शाईचे रहस्य’ या लेखातपाण्यात भूर्जपत्र टाकल्यावर दिसू शकणाऱ्या शाईचे वर्णन केले होते. अश्या प्रकारची शाई तयार करताना अनेक प्रयोगअनेक रासायनिक प्रक्रिया त्या काळात केल्या असतील. वातावरणातील आर्द्रताप्राणवायुअनेक आम्लीय / क्षारीय पदार्थांबरोबर धातूंचा संपर्क झाल्यावर होणाऱ्या प्रक्रिया... यातून धातूंच्या संरक्षणाचे उपाय.. या साऱ्या गोष्टी तेंव्हा माहीत होत्या. ‘याज्ञवल्क स्मृती’ मधे धातुंना शुध्द करण्याची प्रक्रिया दिली आहे. ‘रसार्णव’ मधे सांगितलं आहे की शिसेलोखंडतांबेचांदी आणि सोने ह्या धातूंमध्ये स्वसंरक्षणाची प्रवृत्ती ह्याच क्रमात कमी होत जातेजी आजच्या आधुनिक रसायनशास्त्रा प्रमाणे बरोबर आहे.

हे खरंय की आजच्या रसायनशास्त्राने अफाट प्रगती केलेली आहे. मात्र आजपासून दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी रसायनशास्त्राचे मुलभूत सिद्धांत मांडतअत्यंत व्यवस्थितपरिपूर्ण अशी डॉक्यूमेंटेड सिस्टम भारतामधे कार्यरत होतीज्या द्वारे अनेक क्षेत्रात रासायनिक प्रक्रियांद्वारे कार्य होत होते. औषधी शास्त्रखनिज शास्त्रधातू शास्त्र या सारखी अनेक क्षेत्र होतीज्यात रासायनिक प्रक्रिया आवश्यक होत्या. मात्र महत्वाचे म्हणजे ही सर्व रसायनेजैविक स्त्रोतांपासून प्राप्त केली जात होती. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने ह्या प्रक्रिया चालत होत्या.

आणि हे सर्व करत असताना आपल्या पूर्वजांनी इतकी मोठी विरासत आपल्या साठी मागे ठेवली आहेकी त्यातील अनेक प्रक्रियांचा नीट अर्थ लावणंच आपल्याला शक्य झालेलं नाही. अर्थातच प्राचीन रसायन शास्त्राच्या अभ्यासाची आज नितांत निकड आणि गरज आहे...!!       
               
प्रशांत पोळ

मंगलवार, 26 जून 2018

भूमिगत जल की धारा

******************************समृद्धि पर्यावरण संरक्षण अभियान रूठियाई के अन्तर्गत प्रकृति के संकेतों के द्वारा भूमिगत जल की धाराओं का पता लगाने की जानकारी के संबंध में जनहित में प्रेषित 
******************************केदार सिंह सैनी (संचालक- समृद्धि पर्यावरण संरक्षण अभियान रूठियाई और प्रदेश सचिव मिशन 100करोड़ वृक्ष - मध्य प्रदेश) mob-7898915683

*प्राचीन ग्रंथों में गए प्रकृति के संकेतों से जाने भूमिगत जल की धाराएं
*****************************राहमिहिर का उदकार्गल (जल की रुकावट) ********************************

अतृणे सतृणा यस्मिन् सतृणे तृणवर्जिता मही यत्र।
तस्मिन शिरा प्रदष्ठि वक्तव्यं वा धनं तस्मिन्।।52।।

तृणहीन स्थान पर कोई तृणयुक्त स्थान हो या वहाँ सब दूर घास हो पर एक स्थान पर हरी घास न हो तो वहाँ साढ़े चार पुरुष नीचे शिरा होती है। या गड़ा धन होता है।(52) 

कण्टक्यकण्टकानां व्यत्यासेSम्भस्त्रिभिः करैः पश्चात्।
खात्वा पुरुषत्रितयं त्रिभागयुक्तं धनं वा स्यात्।।53।।

काँटे वाले वृक्षों में एक बिना काँटे का या बिना काँटे के पेड़ों में एक काँटे वाला हो तो उसके तीन हाथ पश्चिम में एक तिहाई सहित तीन पुरुष नीचे जल या धन होता है। (53) 

नदति मही गम्भीरं यसमिंश्चरणाहता जलं तस्मिन्।
सार्धेस्त्रिभिर्मनुष्यैः कौबेरी तत्र च शिरा स्यात्।।54।।

पैर से ठोकने पर भूमि में गंभीर ध्वनि हो तो वहीं साढ़े तीन पुरुष नीचे उत्तर से आता पानी होता है। (54) 

वृक्षस्यैका शाखा यदि विनता भवति पाण्डुरा वा स्यात्।
विज्ञातव्यं शाखातले जलं त्रिपुरुषं खात्वा।।55।।

वृक्ष की एक शाखा भूमि की ओर झुके या पीले पड़ गयी हो तो उसके तीन पुरुष नीचे जल होता है। (55) 

फलकुसुमविकारो यस्य तस्य पूर्वे शिरा त्रिभिर्हस्तैः।
भवति पुरुषैश्चतुर्भः पाषाणोSधः क्षितिः पीता।।56।।

किसी पेड़ के फल-फूल में विकार हो तो उस वृक्ष से तीन हाथ पूर्व में चार पुरुष नीचे शिरा होती है। नीचे पत्थर होता है। और मिट्टी पीले रंग की होती है। (56) 

यदि कण्टकारिका कण्टकैर्विना दृश्यते सितैः कुसुमैः।
तस्यास्तलेSम्बु वाच्यंत्रिभिर्नरैरर्धपुरुषे च ।।57।।

कटेरी का पेड़ काँटों से रहित और सफेद फुलों वाला दिखाई दे तो साढ़े तीन पुरुष नीचे पानी निकलता है। (57) 

खर्जूरी द्विशिरस्कायत्र भवेज्जवलविवर्जिते देशे।
तस्याः पश्चिमभागे निर्देश्यं त्रिपुरुषे वारि।।58।।

जलरहित खजूर के दो जुड़वाँ पेड़ हों तो उससे दो हाथ पश्चिम में तीन पुरुष नीचे जल होता है। (58) 

यदि भवति कर्णिकारः सितकुसुमः स्यात्पलाशवृक्षो वा।
सव्येन तत्र हस्तद्वयेSम्बु पुरुषत्रये भवति।।59।।

सफेद फूल की कनेर या ढाक से दो हाथ दक्षिण में तीन पुरुष नीचे पानी होता है। (59) 

ऊष्मा यस्यां धात्र्यां धूमो वा तत्र वारि नरयुग्मे।
निर्देष्टव्या च शिरा महता तोयप्रवाहेण।।60।।

किसी भूमि से भाप या धुआँ निकलता दिखे तो दो पुरुष नीचे बहुत जल वाली आव होती है। (60)

यस्मिन् क्षेत्रोद्देशे जातं सस्यं विनाशमुपयाति।
स्निग्धमतिपाण्डुरं वा महाशिरा नरयुगे तत्र।।61।।

किसी खेत में खेती पैदा होकर नष्ट हो जाए या बहुत चिकनी खेती हो या उत्पन्न होकर पीली पड़ जाएवहाँ दो पुरुष नीचे बहुत जल होता है। (61)

मरूदेशे भवति शिरा यथा तथातः परं प्रवक्ष्यामि।
ग्रीवा करभाणामिव भूतलसंस्थाः शिरा यान्ति।।62।।

अब मरूप्रदेश (मारवाड़) में भूगर्भ जल शिरा बताते हैं। ऊँट की गर्दन के समान भूमि में ऊँची नीची आव होती है। (62)

पूर्वोत्तरेण पीलोर्यदि वल्मीको जलं भवति पश्चात्।
उत्तरगमना च शिरा विज्ञेया पञ्चभिः पुरुषैः।।63।।

पीलू वृक्ष जल के ईशान (उत्तरपूर्व) में बाँबी से साढ़े चार हाथ पश्चिम में पाँच पुरुष नीचे उत्तर वाहिनी धारा होती है। (63)

चिह्नं दुर्दुर आदो मृत्कपिलातः परं भवेद्वरित।
भवति च पुरुषेSधोSश्मा तस्य तले वारि निर्देश्यम्।।64।।

वहाँ पहले पुरुष में मेंढ़कफिर हल्की पीली के बाद हरे रंग की मिट्टी व पत्थर निकलता है। इनके नीचे जल होता है। (64) 

पीलोरेव प्राच्यां वल्मीकोSतोSर्धः पञ्चमैर्हस्तैः।
दिशि याम्यायां तोयं वक्तव्यं सप्तभिःपुरुषैः।।65।।

पीलू पेड़ के पूर्व में बाँबी हो तो उस वृक्ष के चार हाथ दक्षिण में सात पुरुष नीचे जल होता है। (65) 

प्रथमे पुरुषे भुजगः सितसितो हस्तमात्रमूर्तिश्च।
दक्षिणतो वहति शिरा सक्षारं भूरि पानीयम्।।66।।

यहाँ पहले पुरुष में श्वेत-श्याम एक हाथ लम्बा साँपफिर बहुत खारे पानी की दक्षिण धारा प्रकट होती है। (66) 

उत्तर श्च करीरादहिनिलये दक्षिणे जलं स्वादु।
दशभिः पुरुषैर्ज्ञेयं पुरुषे पीतोSत्र मण्डूकः।।67।।

कटीर के पेड़ के उत्तर में बाँबी हो तो पेड़ से साढ़े चार हाथ दक्षिण में दस पुरुष नीचे मधुर जल होता है। एक पुरुष नीचे पीला मेंढक निकलता है। (67)

रोहीतकस्य पश्चादहिवासश्चेस्त्रिभिः करैर्याम्ये।
द्वादश पुरुषान् खात्वा सक्षारा पश्चिमेन शिरा।।68।।

रोहीतक (रूहीड़ा) वृक्ष के पश्चिम में बांबी हो तो वृक्ष से तीन हाथ दक्षिण में बारह पुरुष नीचे खारे जल की पश्चिम धारा निकलती है। (68)

इन्द्रतरोर्वल्मीकः प्राग्देश्यः पश्चिमे शिरा हस्ते।
खात्वा चतुर्दश नरान् कपिला गोधा नरे प्रथमे ।।69।।

अर्जुन वृक्ष के पूर्व में बाँबी होने पर वृक्ष से एक हाथ पश्चिम में चौदह पुरुष नीचे धारा होती है। यहाँ पहले पुरुष में कपिल वर्ण की गोह होती है। (69)

यदि वा सुवर्णनाम्नस्तरोर्भवेद्वामतो भुजंगगृहम्।
हस्तद्वये तु याम्ये पञ्चदशनरावसानेSम्बु।।70।।

धतुरे के बायें बाँबी हो तो उस पौधे से दो हाथ दायें पन्द्रह पुरुष नीचे पानी होता है। (70)

क्षारं पयोSत्र नकुलोSर्धमानवे ताम्रसन्निभश्चाश्मा।
रक्ता च भवति वसुधा वहति शिरा दक्षिणा तत्र।।71।।

यह पानी खारा होता है और आधा पुरुष पर न्योला व ताम्रवर्ण का पत्थर,तब लाल मिट्टी के बाद जलधारा निकलती है। (71)

बदरीरोहितवृक्षौ संपृक्तौ चेद्विना वल्मीकम्।
हस्तत्रयेSम्बु पश्चात् षोडशभिर्मानवैर्भवति।।72।।

बेर और रूहीड़ा एक साथ हों तो उनसे तीन हाथ पश्चिम में सोलह पुरुष नीचे पानी होता है। (72)

सुरसं जलमादौ दक्षिणा शिरा वहति चोत्तरेणान्या।
पिष्टनिभः पाषाणो मृच्छ्वेता वृश्चिकोSर्धनरे।।73।।

यह जल बड़ा मधुर होता है। पहले दक्षिण फिर उत्तर शिरा भी निकलती है। आटे जैसा सफेद पत्थरश्वेत मिट्टी और आधा पुरुष नीचे बिच्छू होता है। (73)

सकरीरा चेद्वदरी त्रिभिः करैः पश्चिमेन तत्राम्भः।
अष्टादशभिः पुरुषैरैशानि बहुजला च शिरा।।74।।

करीर के पेड़ के साथ बेर का पेड़ हो तो उनसे तीन हाथ पश्चिम में अठारह पुरुष नीचे पूर्वोत्तर से बहती बहुत जल की धारा होती है। (74)

पीलुसमेता बदरी हस्तत्रयसमिते दिशि प्राच्याम्।
विशंत्या पुरुषाणामशोष्यमंभोSत्र सक्षारम्।।75।।

पीलू के साथ बेर के तीन हाथ पूर्व में बीस पुरुष नीचे अटूट खारा पानी होता है। (75)

ककुभकरीररावेकत्र संयुतौ यत्र ककुभबिल्वौ वा।
हस्तद्वयेSम्बु पश्चान्नरैर्भवेत्पञ्चविंशत्या।76।।

अर्जुन और करीर अथवा अर्जुन और बेल का पेड़ एक साथ हो तो उनसे दो हाथ पश्चिम में पच्चीस पुरुष नीचे पानी होता है। (76)

वल्मीकमूर्धनि यदा दूर्वा च कुशाश्च पाण्डुराः सन्ति।
कूपो मध्ये देयो जलमत्र नरैकर विंशत्या।।77।।

बाँबी पर दूब और सफेद कुश हो तो उसके इक्कीस हाथ नीचे पानी होता है। (77)

भूमि कदम्बकयता वल्मीके यत्र दृश्यते दूर्वा।
हस्तत्रयेण याम्ये नरैर्जलं पञ्चविंशत्या।।78।।

कदम्ब के पेड़ होंबाँबी पर दूब हो तो कदम्ब से दो हाथ दक्षिण में पच्चीस पुरुष नीचे पानी होता है। (78)

वल्मीकत्रयमध्ये रोहीतक पादपो यदा भवति।
नाना वृक्षैः सहितस्त्रिभिर्जलं तत्र वक्तव्यम्।।79।।

तीन बाँबियों के बीच तीन तरह के तीन पेड़ो वाला रूहीड़े का पेड़ हो तो वहाँ जल होता है। (79)

हस्तचतुष्के मध्यात् षोडशभिश्चांगुलैरुदग्वारि।
चत्वारिंशत्पुरुषान् खात्वाश्मातः शिरा भवति।।80।।

मध्य में वर्तमान रूहीड़े के पेड़ से चार हाथ और सोलह अंगुल उत्तर में चालीस पुरुष पर पत्थर निकलता है। जिसके नीचे जल धारा होती है। (80)

ग्रन्थिप्रचरा यस्मिञ्छमी भवेदुत्तरेण वल्मीकः।
पश्चात्पञ्चकरान्ते शताधसंख्यकैः सलिलम्।।81।।

बहुत गाँव वाले शमी के उत्तर में बाँबी होने पर उस पेड़ से पाँच हाथ पश्चिम में पचास पुरुष नीचे पानी होता है। (81)

एकस्थाः पञ्च यदा वल्मीका मध्यमो भवेच्छेतः।
तस्मिन् शिरा प्रदिष्टा नरषष्ट्या पञ्चवजिंतया।।82।।

एक ही स्थान पर पाँच बाँबी के बीच के सफेद बाँबी पर पचपन पुरुष गहराई पर जलधारा मिलती है। (82)

सपलाशा यत्र शमी पश्चिम भागेSम्बु मानवैः षष्ट्या।
अर्धनरेSहिः प्रथमं सवालुका पीतमृत्परतः।।83।।

पलाश के साथ शमी से पाँच हाथ पश्चिम मे आठ पुरुष नीचे पानी होता है। आधा पुरुष खोदने पर साँपफिर बालू वाली मिट्टी निकलती है। (83)

वल्मीकेन परिवृत्तः श्वेतो रोहीतको भवेद्यस्मिन्।
पूर्वेण हस्तमात्रे सप्तत्या मानवैरम्बु।।84।।

बाँबी से घिरा सफेद रूहीड़ा पेड़ से एक हाथ पूर्व में सत्तर पुरुष नीचे पानी होता है। (84)

श्वेता कण्टकबहुला यत्र शमी दक्षिणेन तत्र पयः।
नरपञ्चकसंयुतया सप्तयाहिर्नरार्धे च ।।85।।

अधिक काँटे वाले शमी से एक हाथ दक्षिण में पचहत्तर पुरुष नीचे पानी होता है। आधे परस पर साँप निकलता है। (85)

मरुदेशे यच्चिह्नं न जाङ्गले तैर्जर्ल विनिर्देश्यम्।
जम्बूवेतसपूर्वे ये पुरुषास्ते मरौ द्विगुणाः।।86।।

मरुदेश के लक्षण जांगल क्षेत्र में नहीं समझने चाहिए। जामुनवेदमंजनूं वृक्षों से पहले जो जल संकेत दिया वह मरू में दिखे तो मरू में वे दुगने पुरुष मानने चाहिए। बहुत जल के देश को अनूप कहते हैं और जलाभाव का देश मरूस्थल कहलाता है। इन दोनों से भिन्न मध्यम देश जांगल देश होता है। (86)

जम्बूस्त्रिवृत्ता मूर्वा शिशुमारी सारिवा शिवा श्यामा।
वीरुधयो वाराही ज्योतिष्मती च गरुडवेगा।।87।।

सूकरिकमाषपर्णी व्याघ्रपदाशेचेति यद्यहेर्निलये।
वल्मीकादुत्तरत्तस्त्रिपुरुषे तोयम्।।88।।

जामुननिसोतमूर्वाशिशुमारशारिवनशिवाश्यामावाराही कंगनी,गरुडवेगासूकरिकामषवनव्याघ्रपदा (बघनखी) औषधियाँ यदि बाँबी पर हों तो वल्मीक से तीन हाथ उत्तर में तीन पुरुष नीचे पानी होता है। (87-88)

एतदनूपे वाच्यं जाङ्गलभूमौ तु पञ्चभिः पुरुषैः।
एतैरेव निमित्तैर्मरुदेशे सप्तभिः कथयेत्।।89।।

एकनिभा यत्र मही तृणतरुवल्मीकगुल्मपरिहीना।
तस्यां यत्र विकारो भवति धरियां जलं तत्र।।90।।

यह तीन पुरुष नीचे पानी की बात अनूप देश की है। ये लक्षण जांगल देश में हों तो पाँच पुरुष नीचे और मरुस्थल में साथ पुरुष नीचे समझें।(89)जिस एक रंगी भूमि में घासपेड़बाँबीझाड़ी (झूँता) न हो और कुछ अलग सी विकार वाली दिखे तो वहाँ पाँच पुरुष पर पानी होता है।(90) 

यत्र स्निग्धा निम्ना सवालुका सानुनादिनी वा स्यात्।
तत्रर्धपञ्चमैर्वारि मानवैः पञ्चभिर्यदि वा।।91।।

चिकनी नीची बालु रेत हो और पैर रखने से ध्वनि हो तो साढ़े चार या पाँच पुरुष नीचे पानी होता है। (91) 

स्निग्धतरूणां याम्ये नरैश्चतुर्भिर्जलं प्रभूतं च।
तरुगहनेSपि ही विकृतो यस्तस्म त्तद्वदैव वदेत्।।92।।

बहुत से स्निग्ध पेड़ों से दक्षिण में चार पुरुष पर पानी होता है। इन पेड़ों में कोई एक अलग प्रकार के फल-फूल का हो तो उस पेड़ से दक्षिण में चार पुरुष नीचे पानी होता है।(92)

नमते यत्र धरित्री सार्धे पुरुषेSम्बु जाङ्गलानूपे।
कीटा वा यत्र विनालयेन वहवोSम्बु तत्रापि।।93।।

किसी जांगल या अनूप देश में पैर रखने से भूमि दबे वहाँ डेढ़ पुरुष नीचे पानी होता है। जहाँ बहुत से कीड़े दिखाई दें परन्तु उनके रहने का कोई दर न हो तो वहाँ भी डेढ़ पुरुष नीचे पानी होता है। (93)

उष्णा शीता च मही शीतोष्णांभस्त्रिभिर्नरैः सार्धेः।
इंद्रधनुर्मत्स्यो वा वल्मीको वा चतुर्हस्तात्।।94।।

सब दूर गरम जमीन हो और एक स्थान पर ठंडी हो या सब दूर ठंडी हो और एक स्थान पर गरम हो तो वहाँ साढ़े तीन पुरुष नीचे पानी होता है। इन जांगल या अनुप में इंद्र धनुषमत्स्य बाँबी दिखे तो चार हाथ नीचे पानी होता है। (94)

वल्मीकानां पंक्त्यां यद्यकोSभ्युच्छ्रिताः शिरा तदधः।
शुष्यति न रोहते वा सस्यं यस्यां च तत्राSम्भः।।95।।

यदि इन देशों में बहुत से बाँबियों की पाँत हो तोएक बाँबी सवेन्नित हो तो उस उँची के चार हाथ नीचे आव होती है। जहाँ खेती जमकर सूख जाय या जमे ही नहीं वहाँ भी चार हाथ नीचे पानी समझें। (95)

न्यग्रोधपलाशोदुम्बरैः समेतैस्त्रिभिर्जलं तदधः।
वटपिप्पलसमवाये तद्वद्वाच्यं शिरा चोदक्।।96।।

जहाँ बड़पीपल व गूलर एकत्र हों तो इनके नीचे तीन हाथ नीचे पानी निकलता है। दोनों पूर्वो्क्त स्थानों पर उत्तर शिरा होती है। (96)

आग्नेये यदि कोणे ग्रामस्य पुरस्य वा भवति कूपः।
नित्यं स करोति भयं दाहं च समानुषं प्रायः।।97।।

बस्ती से ईशान (पूर्वोत्तर) में कुआँ होने पर सदा भय रहता है। और बस्ती में आग लगती रहती है। जिसमें लोग भी जल जाते हैं। (97)

नैर्ऋत्यकोणे बालक्षयं वनिताभयं च वायव्ये।
दिक्त्रयमेततक्त्वा शेषासु शुभावहाः कूपाः।।98।।

नैर्ऋत्य (दक्षिण-पश्चिम) में कुआं होने पर बालकों का क्षय होता है। वायव्य (उत्तर-पश्चिम) में कूप होने पर स्त्रियों को भय होता है। शेष दिशाएँ शुभ हैं। (98)

सारस्वतेन मनिना दकार्गलं यत्कृतं तदवलोक्य।
आर्याभिः कृतमेतद् वृत्तैरपि मानवं वक्ष्ये।।99।।

यहाँ तक सारस्वत मुनि का उदकार्गल कहा।  
वराहमिहिर की पुस्तक बृहत्संहिता से.............!
------------------------------------------------------------------------------